विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल; DCM Eknath Shinde यांचा ठाम विश्वास

431
Cabinet Decision : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा! ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
  • प्रतिनिधी 

अडीच वर्षांतील महायुती सरकारच्या भक्कम कामगिरीमुळे जनतेने भरभरून पाठिंबा दिला असून, विधानसभेनंतर आता महापालिकांवरही महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.

नौपाडा विभागातील शिवसेना उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आनंद आश्रम येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाचे प्रवेश व शिंदेंचा विश्वास

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठाचे उपविभागप्रमुख प्रितम रजपूत, राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय शाखा प्रमुख संजय कदम, स्वप्नील नेवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडीलकर, आदित्य पंडित, यश सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

(हेही वाचा – Crime : धर्म विचारत तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करुन जीवघेणा हल्ला)

ठाणे – शिवसेनेचा गड

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान ७२ नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत.”

“खरी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही उठाव केला. मुंबईत आतापर्यंत ७० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करुन गेले आहेत. त्यामुळे जनता कोणाला खरी शिवसेना मानते हे स्पष्ट झाले आहे,” असे ते म्हणाले.

कामगिरी हीच ओळख

“शिवसेना वर्षाचे ३६५ दिवस रस्त्यावर काम करणारा पक्ष आहे. निवडणुकीसाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत. यामुळेच शिवसेनेत लोकांचा ओघ वाढत आहे. शिवसेना उबाठा आणि शिवसेना यामध्ये हाच मुख्य फरक आहे,” असा सडेतोड टोला उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) शिवसेना उबाठाला लगावला. हा पक्ष प्रवेश महायुतीच्या आगामी विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.