लोकसभा निवडणूक निकालापूर्व Indi alliance च्या बैठकीत ममता बॅनर्जींनंतर उद्धव ठाकरेही राहणार गैरहजर   

शरद पवार हे सध्या काश्मीरमध्ये असून तिथून ते इंडी आघाडीच्या बैठकीला दिल्लीत जातील.

188

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता १ जून रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा बाकी आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागेल. मात्र तत्पूर्वी निकालानंतरची रणनीती  ठरवण्यासाठी दिल्लीत विरोधी पक्षाच्या इंडी आघाडीची (Indi alliance) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी येणार नाही. त्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरे, संजय राऊतही गैरहजर असणार आहेत.

(हेही वाचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? PM Narendra Modi काय म्हणाले?)

उद्धव ठाकरे संजय राऊत परदेशात गेले फिरायला 

काँग्रेसच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित केली आहे. मात्र त्यात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे दोघेही गैरहजर असतील. कारण हे दोन्ही नेते सध्या परदेशात आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हे नेते कुटुंबासह परदेशात फिरायला गेले आहेत. २ जूनला ते परतणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीत ते अनुपस्थित राहतील, असे बोलले जाते. मात्र ठाकरे गटाचे प्रतिनिधी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहतील. तर शरद पवार हे सध्या काश्मीरमध्ये असून तिथून ते इंडी आघाडीच्या (Indi alliance) बैठकीला दिल्लीत जातील. निवडणुकीच्या निकालापूर्वीची ही महत्त्वाची बैठक आहे. १ जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसने इंडी आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रित केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.