दुबईत एका कार्यक्रमात केरळच्या नागरिकांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आला होता. त्याला आयोजकांनी व्यासपीठावर बोलावून त्याचा सन्मान केला. त्याला पाहून उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला, त्यानंतर नेटकऱ्यांनी आयोजकांना चांगले झोडपले. त्यामुळे ट्रोल झाल्यानंतर अखेर आयोजकांनी माफी मागितली आणि त्यानंतर खुलासेही केले.
View this post on Instagram
आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले आहे. पाकड्यांनी दहशतवादी पाठवून पहलगाम येथे हल्ला केला. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पुढे ८६ तास दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले. आता भारताने पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडले आहेत. अशा वेळी दुबईत केरळच्या नागरिकांनी पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) ला निमंत्रित करून त्याचे उदोउदो केले. त्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, आता आयोजकांनी स्पष्टीकरण दिले आहे. २५ मे रोजी पाकिस्तान असोसिएशन दुबईने ‘ओरमचुवादुकल सीझन २’ नावाची आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. हा कार्यक्रम कोचीन युनिव्हर्सिटी बी.टेक अॅल्युमनी असोसिएशनने आयोजित केला होता. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि उमर गुल यांचा कार्यक्रमात येण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यांना पाहून प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि “बूम बूम” अशा घोषणा दिल्या. व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर लोकांनी तीव्र निषेध नोंदवला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहित आफ्रीदीने (Shahid Afridi) भारतविरोधी विधान केली होती. तरीही आफ्रिदीला कार्यक्रमात कार्यक्रमात आमंत्रित केल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.
या वादानंतर CUBAA ने एक अधिकृत निवेदन जारी केले. यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रित केले नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केले. आमच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती पूर्णपणे अनियोजित होती आणि पूर्व माहितीशिवाय होती. हाताच्या ठशांनी बनवलेल्या सर्वात मोठ्या UAE ध्वजासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ हा आणखी एक कार्यक्रम देखील त्या दिवशी PAD येथे आयोजित करण्यात आला होता, यामध्ये ते उपस्थित राहण्यासाठी आले होते, असे निवेदनात म्हटले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अचानक आफ्रिदी (Shahid Afridi) आणि गुल स्टेजवर आले आणि इतक्या कमी वेळात त्यांना थांबवणे किंवा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते, असे आयोजकांनी सांगितले. “गैरसमज आणि कोणालाही दुखावल्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. आम्ही भारताच्या सांस्कृतिक आणि समावेशक मूल्यांशी वचनबद्ध आहोत आणि कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, असेही या निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community