1 of 8

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. (Pahalgam Terror Attack)

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने पाकिस्तानी दूतावास बंद केले असून, सिंधू पाणी करार देखील रद्द केला आहे. या सर्व कारवाईसोबतच युद्धाचा संशयही व्यक्त केला जातोय. (Pahalgam Terror Attack)

जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध झाले, तर जगभरातील कोणते देश कोणाच्या बाजूने असतील? जाणुन घेऊया ... (Pahalgam Terror Attack)

भारताची सीमा पाकिस्तानसह 7-8 देशांना लागून आहे. देशाच्या उत्तरेस चीन व नेपाळ, ईशान्येस भूतान, पूर्वेस बांगलादेश व म्यानमार, दक्षिणेस श्रीलंका व नैऋत्येस मालदीव आहे. जम्मू-काश्मीरच्या पाकव्याप्त काश्मीर सीमेचा समावेश केल्यास अफगाणिस्तानचा काही भाग भारताशीही सीमासामायिक करतो. (Pahalgam Terror Attack)

भारताचे बहुतांश मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे, ज्याला जगातील सर्वात मोठी शक्ती म्हटले जाते. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका भारताच्या बाजूने आहे. (Pahalgam Terror Attack)

अमेरिकेनंतर, भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक दशकांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत. भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली असून, भविष्यातही असे करार सुरू राहतील. यापूर्वीही रशियाने पाकिस्तानसोबतच्या युद्धात उघडपणे भारताला पाठिंबा दिला होता. (Pahalgam Terror Attack)

गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत. कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. आताही युद्ध पेटल्यास इस्रायलचा भारताला पाठिंबा असेल. (Pahalgam Terror Attack)

अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश पाकिस्तानला मदत करणार नाही. पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे. (Pahalgam Terror Attack)