महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेला, उंच असलेला, रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा आणि स्वराज्याच्या अभूतपूर्व इतिहासाचा साक्षीदार आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असलेला डोंगरमाथ्यावर वसलेला हा किल्ला शौर्य, प्रताप आणि स्वराज्याच्या कथा सांगतो. रायगडाचा (raigad fort) प्रत्येक दगड हा छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या मावळ्यांच्या अतुलनीय धैर्य, पराक्रम आणि दूरदर्शी पणाचं प्रतीक आहे. आजही रायगड हा नव्या पिढ्यांना प्रेरणा देत उभा आहे. तो मराठा साम्राज्याच्या इतिहासाला आकार देणाऱ्या असाधारण शौर्याची आठवण करून देतो. (raigad fort)
“सभासद बखर” या पत्रलेखामध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला (raigad fort) हा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून कसा निवडला हे लिहिलेलं आहे. त्यात असा उल्लेख आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीच्या डोंगराची क्षमता पाहिली. हा डोंगर या प्रदेशातल्या सर्व पर्वत आणि डोंगरकड्यांपैकी सर्वांत उंच आहे. डोंगराच्या खडकाचं अखंड असलेलं स्वरूप ही एक मोठी क्षमता होती. म्हणूनच हा उंच आणि भक्कम असलेला किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला गेला.” (raigad fort)
काल आणि गांधारी नद्यांच्या दऱ्यां – खोऱ्यांनी वेढलेला रायगड किल्ला हा इतर डोंगरांशी जोडलेला नाही. रायगड किल्ल्याची उंची सुमारे १५०० फूट एवढी आहे. यांसारख्याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्याचं अभेद्य स्वरूप नाविन्यपूर्ण लष्करी रणनीतींशी सुसंगत आहे. रायगड किल्ला (raigad fort) हा युनेस्कोने जागतिक वारसासाठी नामांकित केलेल्या “मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया” च्या बारा किल्ल्यांपैकी एक आहे. त्या बारा किल्ल्यांपैकी रायगड हा मराठा साम्राज्यातल्या वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. (raigad fort)
(हेही वाचा – CBI Arrests ED Officer : ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी लाच घेताना रंगेहाथ अटक; सीबीआयने केली कारवाई)
रायगड किल्ल्याचा इतिहास
इ. स. १६५३ साली रायगड (raigad fort) हा मराठा सैन्याने मोरेकडून ताब्यात घेतला. त्यावेळी हा प्रदेश रायरी म्हणून ओळखला जायचा. रायरीचा किल्ला राजधानी म्हणून उभा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे किल्ल्याच्या पुनर्बांधणीचं काम सोपवलं. त्यानंतर ६ जून १६७४ साली रायगड किल्ल्याच्या चौकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. (raigad fort)
डोंगराच्या एका बाजूनेच या किल्ल्यावर जाता येतं. १६८० सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरून (raigad fort) सहा वर्षं हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं. त्यानंतर ते अनंतात विलीन झाले. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची एक मूक आठवण म्हणून उभा आहे. रायगडला दुर्गाराज म्हणूनही ओळखलं जातं. एवढंच नाही तर तिथे असलेल्या मराठा साम्राज्याच्या महत्त्वाच्या खुणा त्याला ‘शिवतीर्थ’ म्हणून ओळख मिळाली आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी देखील मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. (raigad fort)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community