मराठे हे भारतीय इतिहासातले सर्वांत शक्तिशाली योद्ध्यांपैकी एक होते. मराठे हे त्यांचं शौर्य, कुशल रणनीती तसंच मुघल आणि ब्रिटिशांविरुद्धच्या तीव्र प्रतिकारासाठी प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली युगानुयुगे स्वराज्याचं रक्षण करणारं एक विशाल मराठा साम्राज्य स्थापन केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती संभाजी महाराजांसारख्या धाडसी राजांपासून ते बाजीराव पेशवे यांसारख्या उत्कृष्ट सेनापतींपर्यंतच्या या रणधुरंधारांनी आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण केलं. त्यांचं शौर्य, निस्वार्थीपणा आणि नेतृत्वामुळे आजही कित्येक पिढ्या त्यांचा आदर्श घेत आहेत. (maratha warriors)
(हेही वाचा – Ravi Kumar Verma Spy : पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला १४ नौदल जहाजांचा संवेदनशील डेटा शेअर केल्याचे आले समोर)
इतिहासातले महान आणि सर्वांत शक्तिशाली मराठा योद्धे पुढीलप्रमाणे :
छत्रपती शिवाजी महाराज (१६३० – १६८०)
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० साली शहाजीराजे भोसले आणि वीरमाता जिजाबाई यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवाजी महाराजांनी आदिल शाही आणि मुघल सत्तेला विरोध करण्यासाठी एक शक्तिशाली मराठा सैन्य स्थापन केलं. शत्रूशी लढण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला. १६७४ साली रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला गेला. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात कडवी झुंज दिली. पुढे कालांतराने १६८० साली शिवाजी महाराज आजारपणामुळे अनंतात विलीन झाले. (maratha warriors)
(हेही वाचा – Operation Sindoor : …तर पाकिस्तानचे 4 तुकडे निश्चित होते; राजनाथ सिंह यांचा घणाघात)
तानाजी मालुसरे (१६२६-१६७०)
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती होते. त्यांनी १६७० साली आपल्या मुलाच्या लग्नाची पर्वा न करता मुघलांच्या ताब्यातून कोंढाणा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. कोंढाणा किल्ला जिंकतानाच्या लढाईतच त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. गड स्वराज्यात आला पण सिंहासारखा सेनापती तानाजी गेला. म्हणून शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं. आता हा किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जातो.
छत्रपती संभाजी महाराज (१६५७ – १६८९)
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते. १६८१ साली छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. छत्रपती संभाजी महाराज हे पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघलांशी लढणारे पराक्रमी योद्धे होते. १६८९ साली औरंगजेबाने त्यांना पकडले आणि त्यांचा अतोनात छळ केला. पण महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला आणि आपल्या धर्मासाठी मरण पत्करलं. (maratha warriors)
(हेही वाचा – maratha traditional dress : शूरवीर मराठ्यांचा पोशाख कसा होता? चला इतिहासात डोकावून पाहुया!)
शाहू महाराज (१६८२ – १७४९)
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेत अनेक वर्षं घालवली. त्यानंतर त्यांनी तिथून सुटून आल्यावर लगेचच मराठा साम्राज्याच्या गादीवर दावा केला आणि त्यांची काकू ताराबाई आणि त्यांचे दत्तक पुत्र धाकले शिवाजी, यांना आव्हान दिलं. त्यावेळी मराठा साम्राज्याच्या कोल्हापूर आणि सातारा अशा दोन गाद्या तयार झाल्या. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या वाढीसाठी मोलाचं योगदान दिलं. शाहू महाराजांनी १७४९ सालापर्यंत प्रभावीपणे राज्य केलं.
बाळाजी विश्वनाथ भट (१६६२ – १७२०)
बाळाजी विश्वनाथ भट हे शाहू महाराजांचे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते. त्यांनी आर्थिक मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करून साम्राज्याला आर्थिक स्थैर्य आणि बळकटी दिली. तसंच त्यांनी आपल्या कारकिर्दीत कुशल रणनीती आणि कुटनीतीने स्वराज्याचं रक्षण केलं. १७२० साली आजाराने त्यांचं निधन झाले. (maratha warriors)
(हेही वाचा – टीव्ही पत्रकार भासविणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या हनीट्रॅपमध्ये अडकला जवान; NIA चौकशीत नवनवीन माहिती उघड)
पेशवा बाजीराव पहिले (१७०० – १७४०)
बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र बाजीराव बल्लाळ भट यांना शाहू महाराजांनी पुढचे पेशवे म्हणून नियुक्त केलं. बाजीराव पहिले हे एक हुशार सेनापती होते. त्यांनी अनेक यशस्वी मोहिमा राबवून मराठा साम्राज्याचा दूरवर विस्तार केला. ते आपल्या कारकिर्दीत एकही युद्ध हरले नाहीत. १७४० साली रावेरखेडी इथल्या छावणीत असताना आजारपणामुळे त्यांचं निधन झालं.
बाळाजी बाजीराव (नाना साहेब पाहिले) (१७२० – १७६१)
१७४० साली पेशवे बाजीरावांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांचे प्रथम पुत्र नाना साहेब यांना पेशवेपद देण्यात आले. मराठा साम्राज्याच्या वाढीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या दारुण पराभवामुळे ते खचून गेले. त्यानंतर त्यांचं निधन झालं. (maratha warriors)
(हेही वाचा – India A vs England Lions : भारतीय ए संघ आणि इंग्लंड लायन्स दरम्यानचा सामना कुठे पाहता येईल? काय आहेत वेळा?)
नाना साहेब पेशवे दुसरे (१७९६ – १८५७)
नाना साहेब दुसरे हे पेशवे बाजीराव पहिले यांचे दुसरे पूत्र रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांचे दत्तक पुत्र आणि शेवटचे पेशवे होते. १८५७ सालच्या ब्रिटीश सत्तेविरुद्ध झालेल्या उठावामध्ये नाना साहेब हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कानपूर इथल्या बंडाचे नेते होते. १८५७ सालच्या उठावानंतर ते अज्ञातपणे गायब झाले. त्यामुळे त्यांचं काय झालं हे कोणालाही माहिती नाही.
तात्या टोपे (१८१४ – १८५९)
१८५७ सालच्या उठावात तात्या टोपे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी नाना साहेब आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत इंग्रजांविरुद्ध लढा दिला. झाशीच्या पतनानंतर १८५९ साली त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि फाशी दिली. पण तोपर्यंत त्यांनी आपला गनिमी कावा सुरूच ठेवला होता. (maratha warriors)
चिमाजी अप्पा (१७०७ – १७४०)
बाजीराव पहिले यांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा यांनी १७३९ साली वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांचा पराभव केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी बाजीराव पाहिले यांच्यासोबतही अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या होत्या. १७४० साली त्यांचं आरोग्याच्या समस्यांमुळे निधन झालं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community