jaigad fort : जयगड किल्ल्यावर आहे जयवन नावाची सर्वात मोठी तोफ; शत्रू थरथर कापायचे! जाणून घ्या किल्ल्याचा इतिहास

20
jaigad fort : जयगड किल्ल्यावर आहे जयवन नावाची सर्वात मोठी तोफ; शत्रू थरथर कापायचे! जाणून घ्या किल्ल्याचा इतिहास

जयगड किल्ला (jaigad fort) हा अरवली पर्वतरांगांच्या चिल का टीला म्हणजेच गरुडांची टेकडी नावाच्या डोंगरावर वसलेला आहे. या किल्ल्यावरून राजस्थानमधल्या जयपूर इथे असलेल्या आमेरजवळचा आमेर किल्ला आणि माओता तलाव दिसतो. राजा काकिल देव यांनी मीना जमातींकडून अंबर प्रदेश जिंकला आणि अकराव्या शतकाच्या मध्यात जयगड किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यानंतर पुढे शतकानुशतके महाराजा जयसिंग दुसरा यांच्याबरोबरच त्यानंतरच्या शासकांनी या जयगड किल्ल्याच्या रचनेमध्ये वाढ केली. त्यांनी किल्ल्याच्या संकुलामध्ये राजवाड्यातल्या खोल्याही जोडल्या.

आमेर किल्ल्यासारखीच मजबूत आणि संरचनात्मक रचना असलेला हा किल्ला विजय किल्ला म्हणूनही ओळखला जातो. त्याची लांबी उत्तर-दक्षिण दिशेने ३ किलोमीटर आणि रुंदी १ किलोमीटर एवढी आहे. जयगड किल्ल्यामध्ये “जयवन” नावाची तोफ आहे. ही तोफ किल्ल्याच्या परिसरातच तयार केली गेली होती. त्याकाळी ती जगातली सर्वांत मोठी चाकांवरची तोफ होती. जयगड किल्ला (jaigad fort) आणि आमेर किल्ला हे दोन्ही किल्ले भूगर्भीय मार्गांनी जोडलेले आहेत. या किल्ल्यांना एकच संकुल मानलं जातं.

(हेही वाचा – खाजगी शिकवणी म्हणजेच Private Tuition साठी मुंबईत किती शुल्क आकारले जाते?)

जयगड किल्ल्याची रचना

अरावली पर्वतरांगांच्या एका शिखरावर असलेला जयगड किल्ला हा आमेर किल्ल्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर बांधला गेला आहे. या किल्ल्यावरून अरवली पर्वतरांगा आणि आमेर किल्ल्याचं सुंदर दृश्य दिसतं. हा किल्ला जयपूर शहरापासून १० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा किल्ला जयपूर-दिल्ली महामार्गापासून एका छोट्या वळणावर उभा आहे. हे वळण डुंगर दरवाजा इथे असलेल्या जयवान तोफेकडे जातं. हाच रस्ता नाहरगड या आणखी एका महत्त्वाच्या किल्ल्याकडेही जातो. आमेर किल्ल्यापासून एका उंच डोंगराळ मार्गाने थोड्या चढाईने जयगड किल्ल्यापर्यंत (jaigad fort) पोहोचता येतं.

जयगड किल्ल्याचा इतिहास

दारा शिकोहने १६५८ साली मुघल उत्तराधिकाराच्या युद्धादरम्यान जयगड किल्ल्याची उंच अभेद्य मुघल तोफ चौकी सुरक्षित केली. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात आमेरला धुंधर म्हणून ओळखलं जात असे. १०व्या शतकापूर्वी इथे मीनांनी राज्य केलं होतं. सध्याच्या काळात जयगड किल्ला (jaigad fort) म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला प्रत्यक्षात राजवाड्याऐवजी मुख्य संरक्षणात्मक किल्ला होता. आमेर आणि जयगड हे दोन्ही किल्ले एकमेकांशी तटबंदीने जोडले गेले आहेत. १०व्या शतकापासून कचवाहांनी इथे राज्य केलं होतं. आमेर आणि जयगडचा इतिहास कचवाहाच्या शासकांशी कायमचा जोडला गेला आहे, कारण त्यांनी आमेर इथे त्यांचं साम्राज्य स्थापन केलं होतं.

(हेही वाचा – India Tour of England : भारतीय खेळाडूंचा लंडन ते लीड्स ट्रेन प्रवास; प्रवासातील विविध खेळांचा व्हिडिओ केला जारी )

जयगड किल्ला तोफांचा कारखाना

शाहजहानच्या कारकिर्दीत दिल्लीच्या नैऋत्येस १५० मैल अंतरावर असलेला जयगड किल्ला (jaigad fort) हा जगातला सर्वांत कार्यक्षम असा तोफांचा कारखाना बनला. कारण किल्ल्याच्या परिसरात भरपूर प्रमाणात लोहखनिजाच्या खाणी होत्या. जयगड किल्ल्यामध्ये एक मोठा पवन बोगदा होता. हा बोगदा उंच पर्वतांमधून हवा त्याच्या भट्टीत शोषून घेत असे आणि १,३२०°C पर्यंत तापमान निर्माण करत असे. गरम झालेल्या हवेने धातू वितळत असे. वितळलेल्या धातूने जलाशय कक्ष भरत असे आणि कास्टिंग पिटमधल्या तोफांच्या साच्यात हा धातू जात असे.

बहुतेक तोफा या १६ फूट लांब होत्या आणि एका दिवसात तयार केल्या जात असत. तिथल्या राजपूत शासकांनी एक मोठं कल्पक यांत्रिक उपकरण देखील बनवलं होतं. ज्यामध्ये चार जोड्या बैलांनी चालवलेली अचूक गियर सिस्टम होती. हे उपकरण तोफांच्या बॅरल पोकळ करण्यासाठी वापरलं जात असे. १६५८ साली जेव्हा मुघलांच्या उत्तराधिकारासाठी युद्ध सुरू झालं तेव्हा दारा शिकोहने जयगड किल्ल्याचा (jaigad fort) तोफखाना सुरक्षित ठेवला. त्यानंतर औरंगजेबाने त्याला पराभूत करून मृत्युदंड दिला. पण नंतर मुहम्मद शाहने जयगड किल्ल्याचा अधिकृत मुघल किल्लादार म्हणून जयसिंग दुसरा याची नियुक्ती केली. एका फर्मननुसार शेवटी जयसिंग दुसरा याने जयगड किल्ल्यातल्या महत्त्वाच्या फाउंड्री आणि उपकरणांचा वापर करून महान जयवान तोफ तयार केली असं म्हटलं जातं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.