अनैसर्गिक भाषण दाखवून महाराष्ट्रातील जनतेवर परिणाम होणार नाही | Uday samant

87

Uday samant : उद्धव ठाकरे यांच्या नाशिक येथील निर्धार मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. “एका भाषणात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) तर दुसऱ्या भाषणात बबनराव घोलप यांचे नाव आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा व्यासपीठावर बसलेल्या लोकांवरच विश्वास नाही. त्यांनी दुसऱ्या पक्षावर का टीका करायची?” असा सवाल करत उदय सामंत यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “त्यांच्याकडच्या नेत्यांना टिकवण्यासाठी शिंदेंवरती टीका करणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम” असल्याचंही उदय सामंत म्हणाले. (Uday samant)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.