‘Terrorism हा केवळ भारत-पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा नाही तर…’; भारताचा युरोपियन महासंघाला इशारा

Terrorism : दहशतवाद(Terrorism) हा केवळ भारत-पाकिस्तान दरम्यानचा मुद्दा नाहीतर संबंध जगाला धोका आहे, असे विधान केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. दहशतवादा(Terrorism)च्या मु्द्द्यावरून भारताने युरोपियन महासंघाला इशारा दिला आहे.

121

Terrorism : दहशतवाद(Terrorism) हा केवळ भारत-पाकिस्तान दरम्यानचा मुद्दा नाहीतर संबंध जगाला धोका आहे, असे विधान केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. दहशतवादा(Terrorism)च्या मु्द्द्यावरून भारताने युरोपियन महासंघाला इशारा दिला आहे. एस. जयशंकर म्हणाले, दहशतवाद(Terrorism) तुमच्याही घरात येणारच असे सांगताना भारत-पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा नसल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.(Terrorism)

(हेही वाचा Ahmedabad Plane Crash : वैमानिकाला एक मिनिटही मिळाला नाही; काय घडले ‘त्या’ ८ मिनिटांत? )

दरम्यान, भारताने दहशतवादा(Terrorism)विरोधात आपली कठोर भूमिका याआधीच जाहीर केली आहे. त्यानंतर आता ब्रुसेल्स दौऱ्यादरम्यान एस. जयशंकर यांनी जगाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन व युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली. यावेळी एस. जयशंकर यांनी भारताचे धोरणात्मक महत्त्व व जागतिक स्थिती यावर भाष्य केले.

(हेही वाचा अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेवर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; राज्य सरकार सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज )

परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपियन महासंघाच्या प्रमुख धोरणांवर आक्षेपही घेतला. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व दहशतवादा(Terrorism)विरोधात एकता दाखविल्याबद्दल एस. जयशंकर यांनी उर्सुला वॉन डेर लेयन यांचे कौतुकही यावेळी केले. दहशतवादावर भाष्य करताना एस. जयशंकर म्हणाले, ओसामा बिन लादेन हा दहशतवादी वर्षानुवर्षे पाकमधील एका शहरात सुरक्षितपणे राहत होता. ही बाब जगाला समजून घ्यावी लागेल. दहशतवाद(Terrorism) हा जागतिक मुद्दा असून एक ना एक दिवस तुमच्याही घरात येणारच, असा थेट इशारा एस. जयशंकर यांनी ब्रुसेल्स दौऱ्यात दिला.(Terrorism)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.