S Jaishankar : भारत-चीन संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी; एस जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान

135
S Jaishankar : भारत-चीन संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी; एस जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान
S Jaishankar : भारत-चीन संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी; एस जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान

भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या बाबतीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे संबंध रहावे, यासाठी सीमेवर शांतता हवी, असे प्रतिपादन एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी केले. ते एका मुलाखतीदरम्यान बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून (India-China Border Dispute) एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. त्या घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यान अनेक शांतता बैठका झाल्या, मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – टीमसीच्या नेत्यामध्ये हिंदूंविरोधात बोलण्याची हिंमत येते कुठून? PM Narendra Modi यांचा हल्लाबोल )

परिस्थिती चीनच्या हिताची नाही

जयशंकर म्हणाले की, चीनसोबत आपले संबंध सामान्य नाहीत, कारण सीमा भागातील शांतता भंग पावली आहे. पीएम मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती चीनच्या हिताची नाही, हे चीनने लक्षात घेतले पाहिजे. सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करण्याची नितांत गरज आहे आणि भारत आणि चीनमधील शांततापूर्ण संबंध केवळ दोन देशांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत.

जयशंकर पुढे म्हणाले की, मुत्सद्देगिरी हे संयमाचे काम आहे आणि भारत चीनशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करत आहे. संबंध सामान्य करायचे असतील तर सर्व समस्या सोडवायला हव्यात. आम्ही चीनसोबतच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्सुक आहोत. दोन्ही देशातील संबंध सुधारणे, हे सीमेवरील शांततेवर अवलंबून आहे. भारताला आशा आहे की, चीनसोबतचे सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास चीनने व्यक्त केलाय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.