“दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याकरिता भारत मागेपुढे पाहणार नाही”; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांची स्पष्टोक्ती

दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारत प्रत्येक मार्ग वापरण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी केली. गोव्याच्या किनाऱ्यावर भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील अधिकारी आणि नौसैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही तर दहशतवादाविरुध्द भारताचा थेट हल्ला आहे.(Rajnath Singh)

61

दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारत प्रत्येक मार्ग वापरण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी केली. गोव्याच्या किनाऱ्यावर भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील अधिकारी आणि नौसैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही तर दहशतवादाविरुध्द भारताचा थेट हल्ला आहे.(Rajnath Singh)

ते पुढे म्हणाले, जर पाकिस्तानने वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे प्रत्युत्तर भारतीय नौदल देईल असे इशारा देतानाच जर पाकिस्तानने काही आगळीक केली तर त्याला भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेचा सामना करावा लागेल, असेही संरक्षण मंत्री(Rajnath Singh) यावेळी म्हणाले. भारताच्या शक्तिशाली कॅरियर बॅटल ग्रुपने खात्री करतानाच पाकिस्तानला थेट इशारा देत पाकिस्तानी नौदलाने बाहेर पडू नये, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Bihar Assembly Election : निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक; एनडीए सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय )

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या भारताच्या कारवाईत भारतीय नौदलाने पश्चिमी ताफ्याच्या जहाजांनी पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडोचे यशस्वी मारा केले. या कारवाईतून प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि नौसैनिकांची लढाऊ तयारी दिसून आल्याचे सांगतानाच शत्रू(पाकिस्तान)ला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले गेल्याचेही राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी सांगितले.

भारतीय नौदलाच्या कामगिरीबाबत बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, कॅरियर बॅटल ग्रुपच्या फोर्स प्रोजेक्शनने भारताचा हेतू आणि क्षमता प्रभावीपणे दर्शविली. भारतीय नौदलाची प्रचंड शक्ती, लष्करी कौशल्ये आणि विध्वंसक क्षमता यांनी शत्रूचे मनोबल तोडले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी म्हटल्यानुसार यापुढे कुठलीही दहशतवादी कारवाई युध्दचं मानले जाईल, या संदेशाचा स्पष्ट पुनरुच्चार करतानाच जर पाकिस्तानने पुन्हा अशीच चूक केली तर भारताचे प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.(Rajnath Singh)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.