Nuclear Attack : भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणे आता पाकिस्तान थांबवणार; कारण…

गेल्या वर्षी SIPRI चा अहवाल आला होता, त्यात पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे असल्याचा दावा करण्यात आला होता.

234
पहलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यावेळी पाकिस्तान वारंवार भारताला अणुहल्ल्याची (Nuclear Attack) धमकी देत होता. मात्र त्याच वेळी भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठेवलेल्या जागांवरच हल्ले करून पाकड्यांची झोप उडवली होती. पाकड्यांकडे भारतापेक्षा अधिक संख्येने अण्वस्त्र आहेत, त्या जोरावर पाकिस्तान फुशारक्या मारत होता. मात्र आता एका अहवालानंतर पाकिस्तान भारताला पुन्हा अणुहल्ल्याची (Nuclear Attack) धमकी देण्याची हिंमत करणार नाही.
भारताच्या अण्वस्त्र साठ्यात आता मोठी वाढ झाली आहे. या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नवीन अहवाला दावा करण्यात आला आहे की, अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा आघाडीवर आहे आणि तो हळूहळू अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या देखील वाढवत आहे. SIPRI च्या अहवालानुसार, भारत अण्वस्त्रांची संख्या झपाट्याने वाढवत आहे आणि या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे, (Nuclear Attack)
गेल्या वर्षी SIPRI चा अहवाल आला होता, त्यात पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे असल्याचा दावा करण्यात आला होता. या अहवालात म्हणण्यात आले आहे की, भारताचे नवीन ‘कॅनिस्टराइज्ड’ क्षेपणास्त्रे अत्यंत सुरक्षित आहेत. भविष्यात, ही नवीन पिढीची क्षेपणास्त्रे एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम ठरू शकतात. संबंधित अहवालानुसार, भारत एक नवी न्यूक्लिअर सिस्टिम डेव्हलप करत आहे. भारताच्या नवीन पिढीतील क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये अग्नि प्राइम (अग्नि-पी) आणि मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) सक्षम अग्नि-५ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. (Nuclear Attack)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.