पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)वर तुम्हाला जे हवे आहे ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकाना जे हवे आहे ते होईल. तुम्हा सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यनीती आणि चिकाटी माहीत आहे, असेही मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)च्या पार्श्वभूमीवर भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार हे जवळपास निश्चितच म्हणावे लागेल.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)ला भारताकडून कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर संबोधनात आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांना जे हवे आहे तेच होईल. तुम्हाला त्यांची कार्यक्षमता आणि दृढनिश्चय माहित आहे. ते आयुष्यात जोखीम घेण्यास कसे शिकले आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ‘जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहेगा’ (तुम्हाला जे हवे ते होईल),’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर दहशतवाद्यांना ‘योग्य उत्तर’ देण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे संकेत नवी दिल्लीतील संस्कृती जागरण महोत्सवात संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले. राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण मंत्री म्हणून सुरक्षा सुनिश्चित करणे आणि आपल्या देशावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे ही जबाबदारी आहे. दहशतवादविरोधात भारत कठोर करणाऱ्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community