भारताने पाकिस्तानवर आर्थिक हल्ला केलेलाच असताना पुढील रणनीती काय असणार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार बैठका घेण्यात येत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पंतप्रधान मोदींनी संरक्षण विभागाच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीनंतर पाकिस्तानवरील कडक कारवाईबाबत रणनीती तयार करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
(हेही वाचा Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन )
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे. मागील दोन दिवसांत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर आता थेट संरक्षण विभागाच्या सचिवांशी मोदींची बैठक सुरू असून सचिव राजेश कुमार यांच्यासमवेत हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण सचिवांसोबत सुरू असलेल्या बैठकीत पंतप्रधानांची अद्याप चर्चा सुरू असून मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत असताना केंद्रात वारंवार बैठका पार पडताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे उभय देशांमधील लष्कर तयारीत असून पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात आहे. तर दुसरीकडे, भारताची तयारी पाहून पाकिस्तान घाबरला आहे आणि एलओसीवर सतत अग्नी शस्त्रांचा वापर करत आहे. सीमेपलीकडून सातत्याने पाकिस्तानकडून सीझफायरिंग केली जात असून भारतीय लष्कराच्या तयारीनेच पाकड्यांना धडकी भरली आहे.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community