Operation Sindoor : कोलंबिया सरकारला फटकारताना शशी थरुर म्हणतात, ‘भारत दुसरा गाल पुढे करणार नाही’

Operation Sindoor : केंद्र सरकारने 'ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor)संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विदेशात भेटी देत आहेत. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशातील राष्ट्रप्रमुखांची भेट घेत आहेत. यातच आता खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिका, पनामा आणि गयानाला भेट दिल्यानंतर कोलंबिया सरकारला फटकारले आहे. शशी थरूर म्हणाले की, आपण नेहमीच आपल्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे.(Operation Sindoor)

70

Operation Sindoor : केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor)संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विदेशात भेटी देत आहेत. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशातील राष्ट्रप्रमुखांची भेट घेत आहेत. यातच आता खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिका, पनामा आणि गयानाला भेट दिल्यानंतर कोलंबिया सरकारला फटकारले आहे. शशी थरूर म्हणाले की, आपण नेहमीच आपल्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे.(Operation Sindoor)

(हेही वाचा “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा )

भारताच्या लष्करी कारवाईत दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर कोलंबियामध्ये दहशतवाद्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला होता. आता शशी थरूर यांनी कोलंबिया भेटीत स्थानिक सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले, भारत आता दुसरा गाल पुढे करणार नाही. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या खात्माचा शोक व्यक्त करण्याची गरज नाही. खरं तर, कोलंबियाने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर शोक व्यक्त केला होता. ते पुढे म्हणाले, आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी आपण नेहमीच उभे राहिले पाहिजे. तसेच, भीतीशिवाय जीवन जगणे हा आपला अधिकार आहे. यासाठी, आपल्याला त्या दुष्ट लोकां(दहशतवादी)विरुद्ध लढावे लागेल.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’मध्ये महिला जवानांनी दिली धाडसी लढत; कोण आहेत नेहा भंडारी ? )

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पनामासह ५ देशांच्या भेटीत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळोवेळी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शशी थरुर यांनी दहशतवादावर जागतिक स्तरावर भारताची भूमिका माडंली आहे. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्या निष्पाप लोकांना मारल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याकरिता ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) आवश्यक होते, असे पंतप्रधान मोदींनी याआधीच स्पष्ट केले आहे.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.