Operation Sindoor : भारताने पाकिस्तानी हवाई दलाला ५ वर्षे मागे लोटले, कसे ते जाणून घ्या

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी हवाई दलाची पूरती हवाच निघाली. नवीन माहितीनुसार, भारताच्या कारवाई(Operation Sindoor)ने पाकिस्तानी हवाई दलाला ५ वर्षे मागे लोटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

71

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी हवाई दलाची पूरती हवाच निघाली. नवीन माहितीनुसार, भारताच्या कारवाई(Operation Sindoor)ने पाकिस्तानी हवाई दलाला ५ वर्षे मागे लोटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या कारवाईत क्रुझ क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि तत्सम शस्त्रास्त्रांचा वापर करत पाकिस्तानातील एअरबेस नेस्तानाबूत केले होते. चार दिवस चाललेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात भारताने क्लिनिकल पध्दतीने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) केल्याचे संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी एएनआयला सांगितले.

(हेही वाचा FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर )

दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानी हवाई दल चार दिवसांत आंधळे, सुन्न आणि निर्णय घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि भारताविरुद्ध युद्धबंदीची मागणी करण्यास भाग पाडले गेले. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सूत्रांनी सांगितले की, चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाचा जमिनीवर आणि हवेत दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले, असे संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा Odisha मध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक नक्षलवाद्यांनी पळवला, चालकाला ठेवले ओलीस )

भारत-पाकिस्तान दरम्यान मोठी कारवाई दि. ९-१० मे च्या मध्यरात्री झाली, १० मे च्या दुपारपर्यंत चालू राहिली. ज्यात पाकिस्तानच्या लांबी-रुंदीवरील हवाई तळांना भारताने लक्ष्य केले गेले. यात पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील बहावलपूर आणि मुरीदके सारखे भाग देखील समाविष्ट होते. या एअरबेसचे भारताच्या कारवाईत मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, सलग चार दिवस भारताने पाकिस्तानमध्ये अतिशय अचूक हल्ले करत इतके नुकसान केले की ते भरून काढण्यासाठी किमान ५ वर्षे लागतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने सर्वप्रथम पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. हे पाकिस्तानच्या संपूर्ण सीमेवर तैनात करण्यात आले होते. ज्यात जुनी अमेरिका आणि चीनची रडार प्रणाली तसेच चीनकडून मिळविलेल्या (HQ-9) जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या क्षेपणास्त्रांची रेंज २५० किलोमीटरपेक्षा जास्त होती. एकूणातच, लाहोरसारख्या प्रमुख शहरांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची देखरेख क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यांपासून सुरुवात

भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत दि. ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तानवर हल्ला करत ०९ दहशतवादी तळं आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. यात पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील बहावलपूर, मुरीदके आणि सरगोधा यांसारखे भागांचा समावेश होता. भारतीय सैन्यदलाच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने तुर्की आणि चिनी ड्रोन्सचा वापर केला होता पण, त्यांना यात फारसे यश आले नाही.

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्याने नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला

९ मे रोजी भारतीय हवाई दलाच्या आक्रमक कारवाईत पाकिस्तानच्या चकलाला, सरगोधा आणि मुरीदके हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. या तळांवर असलेले कमांड अँड कंट्रोल सेंटर भारताच्या कारवाईत नष्ट करण्यात आले. भारताने या तळांवर शक्तिशाली क्षेपणास्त्रांनी मारा केला. ज्यात जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, रॅम्पेज आणि स्कॅल्प यांचा वापर करण्यात आला. तिन्ही कमांड अँड कंट्रोल सेंटर उद्ध्वस्त झाल्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाचा संपर्क तुटला. यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांचा आणि ग्राउंड स्टेशनचा कोणताही संपर्क नव्हता.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.