Operation Sindoor : भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांचे ०९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय लष्करी कारवाईचे सर्वच स्तरावर कारवाईचं स्वागत होत असताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचं विधान केले. ते म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांनी शौर्य दाखवित नवा इतिहास रचला आहे, असे म्हणत मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले.
(हेही वाचा भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम; उद्धव ठाकरे यांची Operation Sindoor वर प्रतिक्रिया )
दरम्यान, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलतेने कारवाई केली असे सांगताना भारतीय सैन्यांनी कारवाई करताना नागरिकांवर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्याबाबत संवेदनशीलता दाखवल्याचेही मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले. ०६ राज्ये आणि ०२ केंद्रशासित प्रदेशांमधील ५० सीमा रस्ते संघटनेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, सशस्त्र दलांना पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. पाकिस्तानी नागरी लोकसंख्येवर अजिबात परिणाम होऊ नये याची काळजी घेण्यातही संवेदनशीलता दाखवली असून एक प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की भारतीय जवानांनी अचूकता, सतर्कता आणि मानवता दाखवली. संपूर्ण देशाच्या वतीने, मी जवान आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.Operation Sindoor
Join Our WhatsApp Community