‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर डीजीएमओ Lt Gen Rajiv Ghai आता लष्कराचे रणनिती उपप्रमुख

Lt Gen Rajiv Ghai :     ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वसामान्यांच्या चर्चेत आलेले भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) यांची भारतीय लष्कराच्या(रणनिती) उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

139

Lt Gen Rajiv Ghai :     ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वसामान्यांच्या चर्चेत आलेले भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) यांची भारतीय लष्कराच्या(रणनिती) उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान (रणनीती) उपप्रमुखपद हे लष्कराच्या ऑपरेशन्स आणि इंटेलिजेंस डायरेक्टरेट्ससह इतर महत्त्वाच्या विभागांवर देखरेख करण्यासाठी कार्यरत असेल.(Lt Gen Rajiv Ghai)

दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीय लष्करातील सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणून उपप्रमुख(रणनीती) या पदाकडे पाहिले जाते. या पदावर आता ऑपरेशन सिंदूरवेळी डीजीएमओ म्हणून लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) यांनी चोख कामगिरी बजावली होती. ऑपरेशननंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजीव घई यांनी माहिती दिली होती.

(हेही वाचा ‘मृत्यू क्लेशदायक, रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत!’; रेल्वे अपघातावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रतिक्रिया )

दि. ०४ जून दिवशी लेफ्टनंट जनरल राजीवहे घई(Lt Gen Rajiv Ghai) यांना लष्करातील विशिष्ट सेवेबद्दल संरक्षण प्रतिष्ठान समारंभ २०२५ दरम्यान उत्तम युध्द सेवा पदक(UYSM) प्रदान करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्यावर भारतीय लष्कराच्या सेवेकरिता नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लेफ्टनंट जनरल राजीव घई(Lt Gen Rajiv Ghai) डीजीएमओ पदावरही कायम राहणार आहेत. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारताने स्थगित करावे, ही विनंती पाककडून आल्यानंतर त्यास डीजीएमओ लेफ्टनंट जनरल घई(Lt Gen Rajiv Ghai) यांनी प्रतिसाद दिला होता.

पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान लेफ्टनंट जनरल घई भारतातील प्रत्येक सामान्य माणसाला परिचित झाले. पत्रकार परिषदेत ते सैन्याचा चेहरा होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामंजस्य झाल्यानंतर काही दिवसांनी, १२ मे रोजी घई यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या तयारी आणि समन्वित प्रतिसादावर भर दिला. या कारवाईत नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याशिवाय दहशतवादी लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आले.(Lt Gen Rajiv Ghai)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.