Iran-Israel War : इराण-इस्त्रायल संघर्ष(Iran-Israel War) आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)नंतर विविध देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इराण-इस्त्रायल संघर्षा(Iran-Israel War)च्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांकरिता सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासाने केलेल्या व्यवस्थेद्वारे शहराबाहेर हलविण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.(Iran-Israel War)
(हेही वाचा Iran-Israel War : इस्त्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांचं ठरलं; म्हणाले, ‘खोमेनींना थेट लक्ष्य केल्याने…’ )
According to the Ministry of External Affairs (@MEAIndia):
Indian students in #Tehran have been moved out of the city for reasons of safety, through arrangements made by the Embassy. Other residents who are self-sufficient in terms of transport have also been advised to move… pic.twitter.com/3abKjd4WzN
— All India Radio News (@airnewsalerts) June 17, 2025
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासाने केलेल्या व्यवस्थेद्वारे शहराबाहेर हलवण्यात आले आहे. वाहतुकीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या इतर रहिवाशांनाही परिस्थिती लक्षात घेता शहराबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले की, काही भारतीयांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सर्व शक्य मदत देण्यासाठी दूतावास समुदायाशी सतत संपर्कात आहे. परिस्थिती स्थिर असल्याने पुढील सूचना जारी केल्या जाऊ शकतात, असेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी
इस्रायल-इराण संघर्षा(Iran-Israel War)दरम्यान सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क झाला नाही. आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले होते. याचबरोबर इराक व पाकिस्तानने त्यांचे विद्यार्थी इराणमधून बाहेर काढले, असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर आता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू केली आहे.(Iran-Israel War)
Join Our WhatsApp Community