Indus Water Treaty : एक-एक थेंब पाण्यासाठी तडफडताहेत! भारताच्या वॉटर स्ट्राईकने पाकिस्तानला कंठशोष

Indus Water Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक करत सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगित केला. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगित राहण्याची चिन्हे आहेत.

57

Indus Water Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक करत सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगित केला. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगित राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता जलकरार(Indus Water Treaty) रद्द झाल्यानंतर धरणे कोरडी झाली असून शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका सद्यस्थितीस बळावलेला आहे.(Indus Water Treaty)

दरम्यान, पाकिस्तानने भारताला तब्बल चारवेळा पत्र लिहित जलकरारा(Indus Water Treaty)संदर्भात पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पाकिस्तानला पाण्याची आस लागलेली असून भारत आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सध्याचे चित्र आहे. यंदा पाकिस्तानातील सिंधू नदीवर बांधलेल्या धरणांमधून कमी पाणी सोडले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १५ टक्के कपात करण्यात आली आहे.

(हेही वाचा जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव : Uday Samant )

अधिकृत आकडेवारीनुसार, सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगित झाल्यापासून पाकिस्तानला धरणांतून पाणी सोडण्याच्या प्रमाण कपात केली आहे. सिंधू नदीतून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सोडले जाणारे पाणी फक्त १.२४ लाख क्युसेक इतके कमी झाले आहे. याच पाण्याचे प्रमाण गेल्या वर्षी १.४४ लाख क्युसेक इतके होते. विशेष म्हणजे भारताने सिंधू जलकरार(Indus Water Treaty) रद्द केल्याचा परिणाम पाकिस्तानवर दिसून येत आहे.

ऐन उन्हाच्या कडाक्यात धरणातील पाणी आटल्याने पाकिस्तानमधील शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान अंतर्गत दहशतवादाला बंद करणार का, जेणेकरून भारताकडून सिंधू जलकरार(Indus Water Treaty) स्थगितीबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावरून चहूबाजूने जागतिक स्तरावर तोंडघशी पडला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने याआधीच पाकिस्तानला चेतावणी दिली असून दहशतवादी कारवाईला युध्दाच्या भाषेतच प्रत्युत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात धरणे कोरडे, नागरिकांना पाण्याची आस

भारताच्या सिंधू जलकरारा(Indus Water Treaty)संदर्भातील निर्णयानंतर पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये शेती आणि इतर उद्योगक्षेत्र सिंधू नदीच्या जलस्त्रोतावर अवलंबून आहे. त्यामुळे सिंधू नदी पंजाबसह पाकिस्तानच्या इतर राज्यांसाठी जीवनवाहिनी आहे. पाकिस्तानात या नदीवर अनेक धरणेही बांधण्यात आली असून आता नदीतून पंजाब प्रांताला सोडले जाणारे पाणी फक्त १.२४ लाख क्युसेक इतके कमी झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील सिंधू नदीवर बांधलेल्या धरणांमधून यावर्षी कमी पाणी सोडले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ टक्के घट झाली आहे.(Indus Water Treaty)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.