(जागतिक क्षेत्रामध्ये केवळ सार्वजनिकरीत्या आणि व्यावसायिक उपग्रहांद्वारा उपलब्ध असलेली माहिती या लेखासाठी वापरलेली आहे.)
भारताचे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशन (DRDO), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आणि भारतीय सशस्त्र सेनादले यांनी मिळून आत्मनिर्भर, अत्याधुनिक आणि स्वतन्त्र अशी आकाश-तीर एक “रियल-टाईम टारगेटिंग आणि इंटरसेप्शन सिस्टिम” (RTIS) तयार केलेली आहे. भारताच्या या अमोघ आकाश-तीर ने आधुनिक युद्धाचे सर्व तन्त्रच बदलून टाकले आहे. ISRO च्या उपग्रहांचे जाळे, भारतीय-GPS नाविक (NAVIC) चे अचूक मार्गदर्शन आणि स्वतन्त्र स्टेल्थ (शत्रूच्या रडार्सना अदृश्य असलेल्या) ड्रोन्स (Autonomous Stealth Drones) यांच्यावर आधारित, आकाश-तीर (Akash Teer) ने आधुनिक युद्ध-तंत्रामध्ये जबरदस्त सुधारणा तर केलीच, शिवाय “ऑपरेशन-सिंदूर” (Operation Sindoor) मधील आकाश-तीर चे अप्रतिम कार्य पाहून वॉशिंग्टन, बीजिंग, अंकारा, रावळपिंडी या राजधान्यांमधील रणनीतिकार तज्ज्ञांमध्ये खळबळ माजवली आहे!

सन 1999 च्या कारगिल युद्धाचे वेळी, यू.एस.ए.ने उपग्रहांचे GPS सिग्नल्स बंद केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांना ते युद्ध GPS-व्यतिरिक्त लढावे लागले होते. त्या अनुभवातून भारताने धडा घेतला. सन 2014 नंतर संशोधनाला गती मिळून, भारताने ISRO द्वारा अवकाशामध्ये स्वतःच्या उपग्रहांचे स्वतन्त्र जाळे निर्माण केले आणि त्यावर आधारित आत्मनिर्भर भारतीय-GPS प्रणाली, नाविक (NAVIC) निर्माण केले. यू.एस.ए.च्या आणि रशियाच्या उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज जगांत सगळ्यांना माहित आहेत. मात्र भारतीय उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज गुप्त असून, त्या हव्या तेंव्हा बदलण्याची सोयही आहे. नाविकची अचूक नॅव्हिगेशन (मार्गदर्शन) पद्धती आकाश-तीरच्या (शत्रूच्या रडार्सना अदृश्य) स्टेल्थ-ड्रोन्सना त्यांच्या लक्ष्यावर मारा करण्यास पंधरा सेंटिमीटर्सच्या अचूकतेने पोहोचविते.
इस्राईलचे आयर्न-डोम आणि बराक, चिनी HQ-9, तसेच यू.एस.ए.ची इंटिग्रेटेड एअर कमाण्ड आणि मिसाईल डिफेन्स बॅटल कमाण्ड सिस्टिम यांना तुल्यबळ, किंबहुना त्यांच्यापेक्षा कांकणभर श्रेष्ठ, भारताचा आकाश-तीर आहे. युद्धशास्त्राच्या आधुनिक इतिहासात प्रथमच NATO चा सदस्य नसलेल्या, एका “प्रगतीशील” पौर्वात्य देशाने पूर्णतः “देशी बनावटीची” उपग्रह-नॅव्हिगेशन पद्धती आणि AI वापरणारी, स्वयंपूर्ण, बदलणाऱ्या युद्धस्थितीवर मात करू शकणारी आणि अवकाशावर प्रभुत्व ठेवणारी अमोघ आकाश-तीर युद्ध-शक्ति निर्माण करून, “ऑपरेशन सिंदूर”मध्ये प्रत्यक्ष यशस्वीरीत्या वापरली.

आकाश-तीर काय आहे?
भारतीय सेनेच्या “वायू-रक्षा पद्धती” मधील आणि भारतीय वायुसेनेच्या Integrated Air Command and Control System (IACCS)चा भाग असलेली आकाश-तीर ही AI वर आधारित, विविध-स्तरीय, स्वसंरक्षण करून शिवाय विरोधी शस्त्रास्त्रांना पाडू शकणारी स्वचालित अमोघ शक्ति असून, ती पुढील तत्वे वापरते:
(1) ISRO ने बनवलेल्या, पृथ्वीवर सतत लक्ष ठेवणाऱ्या, उपग्रहांनी पाठवलेली रियल-टाईम चित्रे.
(2) भारतात बनवलेल्या, नाविक (NAVIC)-GPS-सिस्टिमने तयार केलेल्या, अचूक नकाशांच्या साहाय्याने “लक्ष्यभेद” (टार्गेट-लॉकिंग).
(3) स्वयंचालित ड्रोन्स [5-10 किलोग्रॅम वजनाचा दारूगोळा असलेले, वेगवान, लांब-पल्ल्याचे रडारला न दिसणाऱ्या (स्टेल्थ) डिझाईनचे, आणि स्वॉर्म (Swarm) करू शकणारे] ड्रोन्स आणि मिसाईल्स.
(4) AI वापरून स्वतः त्वरित निर्णय करू शकणारी, भारतात बनवलेली, कमाण्ड-ग्रिड सिस्टिम.
(5) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने बनवलेली रणांगणाचा चपखल आढावा घेणारी, युद्धक्षेत्रामध्ये कोठेही वापरण्याजोगी (फील्ड-डिप्लॉएबल) कंट्रोल-सेंटर्स असलेली, सुरक्षित संपर्क-प्रणाली.
(6) आकाश-तीर हे एक अस्त्र किंवा ड्रोन नाही, तर हे अनेक युद्धप्रणाल्यांना [उपग्रह, ड्रोन्स, जमिनीवरील रडार्स, चल-युद्ध-केन्द्रे (mobile war rooms)] एकत्र करून, AI-प्रोसेसर्स वापरून, स्वसुधारक (सेल्फ-अपडेटिंग), आपोआप हल्ला करणारी ढगांतील संरक्षक (auto-striking defensive cloud) शक्ति आहे.
(7) आकाश-तीरच्या एकात्मिक सेन्सर्स (Sensors) अशा आहेत: त्रिमिती टॅक्टिकल (3D Tactical) रडार्स, कमी-उंचीवरील लक्ष्य पाहणारी हलकी (Low-Level Lightweight) रडार्स, आणि आकाश शस्त्र-प्रणाली (Weapon-System).
आकाश-तीरने जगाला धक्का कां दिला आहे?
(1) ISRO चे उपग्रह रणांगणावर सतत ‘सर्वदर्शक’ नजर ठेवतात (Real-Time Combat Eyes): पारंपरिक पद्धतीमध्ये लक्ष्यासंबंधीची माहिती (Data) त्यावर काही कृती करेपर्यंत जुनी होत असे. ISRO च्या CARTOSAT आणि RISAT या उपग्रह-प्रणालीतून आलेली अत्याधुनिक माहिती (Real Time Data) वापरल्याने आकाश-तीर ला वाटेतील पृथ्वीतलानुसार सद्यस्थितीतील लक्ष्यावर त्वरित हल्ला करण्याची (Real-time targeting and terrain-adaptive decision making) क्षमता देते. विदेशी (यू.एस.ए किंवा चिनी) उपग्रहांपेक्षा, स्वदेशी उपग्रह जास्त कार्यक्षम ठरले.
(2) GPS च्या तुलनेमध्ये “नाविक” – भारताची स्वतःचे अचूक अस्त्र: जमीन डोंगराळ असो किंवा वाळवंट असो, कमाल-अचूकता (Precision Accuracy) देणारा भारताच्या स्वतःच्या उपग्रहांचा संच दक्षिण-आशियामध्ये, पाश्चात्य-GPS पेक्षा जास्त विश्वसनीय आहे. शिवाय स्थानिक नाविक-मार्गदर्शक-प्रणाली (Guided Systems) यू.एस.ए किंवा चिनी GPS-मार्गदर्शक प्रणालीपेक्षा जास्त प्रभावी ठरली.
(3) आकाश-तीर च्या ड्रोन वरील शस्त्रास्त्रे – तीव्र (Sharp), रडार्सना अदृश्य (Stealthy) आणि स्मार्ट:
आकाश-तीरच्या प्रत्येक ड्रोनचे वैशिष्ट्य:
(अ) 5-10 किलोग्रॅम्स शस्त्रास्ते (Payload) नेऊ शकते: [उदा. स्फोटके, जॅमर्स आणि टेहळणीचे साहित्य (Surveillance Kits)].
(ब) जमिनीपासून कमी उंचीवरून उडते आणि रडार्सना न दिसण्याचे तंत्र वापरू शकणारे.
(क) ऐनवेळी लक्ष्यांमध्ये बदल केले तरी, स्वमार्गदर्शन (Self-Navigation) करू शकते.
(ड) पारंपरिक चिनी आणि पाकिस्तानी रडार्सना अदृश्य.
(ई) ही ड्रोन्स “बाजारू” नसून, प्रत्येक ड्रोनची रचना युद्धातील “कामिकाझे” कार्यासाठी केलेली आहे. प्रत्येक ड्रोन शत्रूला कोठलीही चाहूल लागू न देतां, टेहळणी आणि मारा करून, दिलेले लक्ष्य नष्ट (Observe and Annihilate) करू शकते.

(4) AI आणि स्वार्म कॉम्बॅट तन्त्र वापरल्यामुळे “मानवी उशीर” नाही (AI + Swarm Combat = No Human Delay):
आकाश-तीर चा युद्ध-ढग (Combat-Cloud) त्याच्या प्रक्रियेसाठी पुढील तंत्रांचा वापर करते: Edge-AI, शत्रूच्या रडार्सचे सिग्नल्स, जमिनीवरील वाहनांच्या हालचाली, हवामान आणि जमिनीची उंच-सखलता, इत्यादी. प्रत्यक्ष युद्धात होणारे बदल त्वरित विचारांत घेऊन, आकाश-तीर नवी लक्ष्ये ठरवून, त्यांवर मिसाईल किंवा ड्रोन पाठवून, त्यांना नव्या सूचना देऊन, बदललेल्या मार्गावर काही सेकंदांत पाठवू शकते (Reprogram Missile/Drone Paths). NATO आणि चिनी पारंपरिक “मानवी-कमाण्ड पद्धतींच्या” तुलनेमध्ये आकाश-तीर ची ही “शून्य-मानवी उशीर प्रक्रिया” प्रचंड सुधारणा आहे.
जगभरातून आलेल्या प्रतिक्रिया:
- “ट्रम्प यांच्या “बफेलो-सिस्टिमवर” मोदींच्या “बंगलोर-सिस्टिमची” मात!”
- “प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली भारताची अभूतपूर्व प्रगती.”
- “यू.एस.ए. आणि चीन यांना धक्का बसून तेथे धांवपळ चालू आहे.”
- पाकिस्तनमध्ये चीनने बसवून दिलेल्या रडार्सच्या अभेद्य कवचाला भेदून, आकाश-तीरच्या ड्रोन्स आणि मिसाईल्सनी त्यांच्या लक्ष्यांवर केलेले, यू.एस.ए.ला तुल्यबळ किंबहुना त्यांपेक्षाही प्रभावी, यशस्वी हल्ले पाहून अमेरिकेच्या “पेन्टागॉन” मधील विश्लेषक हतबद्ध झाले आहेत. “यू.एस.ए.ला भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा अंदाज कसा आला नाही?” या विषयावरून त्यांच्याकडे “अंतर्गत समीक्षा” (Internal Reviews) चालू झाल्या आहेत.
“चीन – भयमिश्रित शांतता”
आकाश-तीर च्या यशामुळे, चीनने त्यांच्या उपग्रह आणि ड्रोन प्रणालींच्या (CASC आणि BeiDou) कार्यशैलीमध्ये बदल करून, “आकाश-तीरवर मात कशी करतां येईल?” याचा अभ्यास सुरू केला आहे. चिनी विश्लेषकांचे एकमत आहे की, इतक्या यशस्वीरीत्या उपग्रह आणि AI यांची सांगड घालून, भारत आकाश-तीरसारखे यश मिळवू शकेल, असे त्यांना वाटले नव्हते. एवढी मोठे आश्चर्य मिळाल्यामुळे, चिनी सैनिकी भाष्यकार अनपेक्षितपणे चूप आहेत.
तुर्कीच्या – ड्रोन प्रभुत्वाला धक्का:
तुर्कीचे “बैरक्तार” (Bayraktar) TB2 अनमॅनड एरियल व्हेईकल्स (UAVs), हे ड्रोन्स म्हणून ओळखले जातात. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये 2020 मध्ये झालेल्या नागोरनो-काराबाख (Nagorno-Karabakh) युद्धामध्ये, “बैरक्तार” TB2 UAVsवर तुर्कीच्या रोकेस्तान (Roketsan) कंपनीचे MAM-L प्रकारचे लेझर-गायडेड बॉम्ब्स (Laser-Guided Bombs) बसवून वापरले होते. त्यांचा फायदा होऊन, अझरबैजानने ते युद्ध जिंकले होते. त्यामुळे संरक्षण-सामुग्री पुरवणाऱ्या राष्ट्रांमध्ये तुर्कीचा दर्जा वाढला होता. तुर्कीने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरपूर्वीच शेकडो “बैरक्तार” TB2 UAVs पुरवल्या होत्या. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीच्या लक्षांत आले की, “बैरक्तार” TB2 UAVsच्या तुलनेमध्ये आकाश-तीर कमी वजनाची, जास्त स्टेल्थ असणारी, जास्त स्वतन्त्र, अर्थात जास्त श्रेष्ठ सिस्टिम आहे. तुर्की आता “बैरक्तार” TB2 UAVला अपग्रेड करण्याच्या मागे आहे.

आकाश-तीर पुढे पाकिस्तान हवालदिल झाले:
चीनने बसवून दिलेली पाकिस्तानी वायू-रक्षा प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टिम) आकाश-तीरच्या अमोघत्वापुढे टिकू शकली नाही. आकाश-तीर च्या फ्रिक्वेन्सीज पकडू न शकल्यामुळे, यू.एस.ए.ने पुरवलेली “अर्ली वॉरनिंग आणि कन्ट्रोल सिस्टिम” (AWACS) तसेच अँटी-ड्रोन रडार्स (Anti-drone Radars) पूर्णतः निकामी ठरली.
सध्या पृथ्वीतलावरील सर्वोच्च सिस्टिम आकाश-तीर
(अ) शंभर टक्के आत्मनिर्भर तन्त्रज्ञान – कोठलेही परदेशी चिप्स, प्रोसेसर्स किंवा गायडन्स मटेरियल वापरलेले नाही.
(ब) ISRO-BEL-DRDO यांचे सहकार्य – अभूतपूर्व समन्वयाने निर्माण केलेली अचूक आणि अमोघ अस्त्र-प्रणाली भारतीय वायुसेनेच्या एकात्मिक वायू-रक्षा प्रणालीची (इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टिम) महत्वाची शक्ति आहे.
(क) परदेशांवर अवलंबित नसलेली – यू.एस.ए. किंवा NATO चे उपग्रह, GPS किंवा कोठलीही उपकरणे यांचा वापर केलेला नाही.
(ड) युद्ध-तत्पर प्रणाली – रडार्सना अदृश्य (Stealth) + वेगवान + Swarm Control = युद्ध-तत्पर प्रणाली. आज मित्तीला जगांतील कोठलीही अशी प्रणाली वरील तिन्ही तत्वे एकत्र वापरात नाही.
(ई) अत्यंत साधी आणि सोपी कमाण्ड-पद्धती – एका लॅपटॉपच्या साईझचे कमाण्ड-सेंटर, जीपमध्ये ठेवूनही वापरता येते.
युद्धाच्या रणनीतीवरील परिणाम:
(अ) आकाश-तीर केवळ एक युद्ध-प्रणाली नसून, युद्ध-शास्त्रामधील “क्रान्ति” आहे.
(ब) आत्मनिर्भर-भारताच्या सशस्त्र सेनादलांसाठी आकाश-तीर ही स्वतन्त्र प्रभुत्वाची प्रणाली आहे.
(क) जागतिक मंचावर एका नव्या “सैनिकी सुपर-पॉवरचा” उदय झालेला आहे.
(ड) शत्रूंसाठी: भारताच्या शत्रूंच्या मनांमध्ये आकाश-तीर ने भीति, गोन्धळ आणि असहाय्यता निर्माण केलेली आहे.
(ई) भारत-पाकिस्तान रणांगणावर: आकाश-तीर ने स्वतःचे अमोघत्व “ऑपरेशन सिंदूर” मध्ये सिद्ध केलेले आहे.
(फ) जगातील देशांच्या, विशेषतः यू.एस.ए. आणि चीनच्या, नजरेमध्ये युद्ध-तन्त्रज्ञानामध्ये आणि सैनिकी-साहित्यामध्ये भारताचे नेतृत्व स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे.
(ग) आकाश-तीरने युद्धशास्त्राचे नियमच बदलून टाकले आहेत. तन्त्रज्ञानामध्ये प्रगतीशील देश ही हीनभावना जाऊन, AI-Warfare मध्ये प्रगत देश म्हणून भारत नावाजला जात आहे.
(ह) जगातील सर्व देश शांततेने अवलोकन करीत आहेत. ही शांतता प्रभुत्वामुळे निर्माण झालेली नाही, तर त्यांना धक्का बसल्यामुळे निर्माण झालेली शांतता आहे. कारण आकाश-तीर ही केवळ एक युद्ध-प्रणाली राहिलेली नसून, भारताने अवकाशात सोडलेले ते एक प्रभू श्रीरामचन्द्रांचे अमोघ अस्त्र आहे, जे लक्ष्य-भेद करणाराच.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community