Indian Delegations : खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळा(Indian Delegations)ने कोलंबिया सरकारची भेट घेत दहशतवादविरोधातील भारताची अधिकृत भूमिका मांडली. भारताने दिलेल्या सविस्तर तपशीलानंतर कोलंबिया सरकारने आपले विधान मागे घेतले. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या कोलंबियाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करणारे विधान अधिकृतपणे मागे घेतले आहे.(Indian Delegations)
(हेही वाचा ReleaseSharmistha :ममता सरकारचं बेकायदेशीर कृत्य; हिंदू विद्यार्थिनीच्या अटकेसाठी कोलकाता पोलिसांची घिसाडघाई )
दरम्यान, सर्वपक्षीय शिष्टमंडळा(Indian Delegations)चे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी याआधीच चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, भारत कोलंबिया सरकारच्या प्रतिक्रियेमुळे थोडा निराश झाला होता. भारताच्या प्रतिक्रियेनंतर आता कोलंबिया सरकारने दहशतवादासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे.
(हेही वाचा Jyoti Malhotra Spy : मोहम्मद कासिमच्या अटकेनंतर हेर ज्योती मल्होत्राचं नवं कनेक्शन समोर )
कोलंबिया सरकारमधील उप-परराष्ट्र मंत्री रोसा योलांडा व्हिलाविचेंसिओ म्हणाल्या की, भारताकडून आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणामुळे आणि खरी परिस्थिती, संघर्ष आणि काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांबद्दल दिलेल्या तपशीलवार माहितीमुळे दोन्ही देशांत संवाद सुरू ठेवू शकतो याचा आम्हाला खूप विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
खासदार शशी थरुर काय म्हणाले?
भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल कोलंबिया सरकारने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला थोडे निराशा झालो. परंतु, आता कोलंबिया सरकारने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईबाबत सहानुभूती दाखवण्याऐवजी मनापासून शोक व्यक्त केला आहे, असे शशी थरूर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आम्ही कोलंबिया सरकारला सांगू इच्छितो की, दहशतवादी पाठविणारे आणि त्यांचा प्रतिकार करणारे यांच्यात कोणतीही समानता असू शकत नाही. भारत फक्त स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत असून जर यासंदर्भात कुठलाही गैरसमज असेल तो आम्ही या माध्यमातून दूर करण्यासाठी येथे आलो आहोत, असेही ते पुढे म्हणाले.(Indian Delegations)
Join Our WhatsApp Community