India-Pakistan War : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव असताना तुर्की नौदलाची युद्धनौका कराची बंदरात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुर्की नौदलाचे जहाज टीसीजी ब्युयुकाडा सदिच्छा भेटीसाठी कराची बंदरात पोहोचल्याचा दावा पाकिस्तानी नौदलाकडून करण्यात आला. मात्र युध्दाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानने मित्रराष्ट्राकडे मदतीचा हात मागतिल्याची शक्यता वर्तविली जात आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देश आपली लष्करी ताकद दाखवताना दिसून येत आहेत. तुर्कीच्या युद्धनौकेचे कराची बंदरात येणे पाकिस्तान-तुर्की यांच्यातील दृढ संबंध, बंधुभाव व स्थायी मैत्रीचं ज्वलंत उदाहरण आहे, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.
(हेही वाचा Pakistan : ते अपयशी राष्ट्र, भारताला शांततेत जगू देणार नाही, औवेसी म्हणाले, पंतप्रधानांनी… )
पाकिस्तानने म्हटले आहे की तुर्की नौदलाचे जहाज सद्भावना म्हणून येथे आले आहे. परंतु भारतासोबतची सध्याची परिस्थिती बघता याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले जात आहे. तुर्की नौदलाचे जहाज टीसीजी बुयुकाडा कराची बंदरात पोहोचताच जोरदार स्वागत करण्यात आले. पाकिस्तान आणि तुर्कीच्या नौदलातील व्यावसायिक मुद्दे, प्रशिक्षण सहकार्य आणि परस्पर हिताच्या इतर बाबींवर चर्चा केली जाईल, असा दावा पाकिस्तान करत आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता युद्धाच्या भितीने बिथरलेल्या पाकिस्तानने मदतीसाठी मित्रराष्ट्राला मारलेली ही हाक असावी, अशीच शक्यता जास्त व्यक्त केली जात आहे.
खरं तर, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, संरक्षणमंत्री आदी उपस्थित होते. एकंदरीत, पाकपुरस्कृत दहशतवादावर कठोर कारवाई करण्यास भारत सज्ज झाला आहे. India-Pakistan War
Join Our WhatsApp Community