
पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची (India-Pakistan War ) परिस्थिती कायम आहे. अशातच पाकिस्तानकडून सीमेवर सतत बोळीबार केल्याची घटना घडत आहे. परिणामी त्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने वेळो वेळी पाकड्यांना धडा शिकवला आहे. (India-Pakistan War )
हेही वाचा-India VS Pakistan War : राजस्थानमधून घुसखोरी करणारा पाकिस्तानी रेंजर BSF च्या ताब्यात !
शनिवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूरला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केलाय. पाकिस्तानी लष्कराच्या चौकीवरून छोट्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आलाय, ज्याला भारतीय लष्कराने योग्य प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानने 24 एप्रिलच्या रात्रीपासून दररोज रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केलाय. तर शनिवारी सलग दाहव्या रात्री ही गोळीबारची घटना घडलीय. (India-Pakistan War )
हेही वाचा- India : खांद्यावरून वाहून नेता येणारे आधुनिक क्षेपणास्त्र भारतात येणार; काय आहे त्याची वैशिष्ट्ये?
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैन्याने नमूद केले आहे की, “०३-०४ मे २०२५ च्या रात्री, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवरून लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने तातडीने आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर दिले.” (India-Pakistan War )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community