CDS : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ‘फ्युचर वॉर्स अँड वॉरफेअर’ या विषयावरील व्याख्यानात तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख(CDS) जनरल अनिल चौहान यांनी सहभाग घेतला. या व्याख्यानात बोलताना (CDS) जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं भाष्य केले आहे. ते म्हणाले, १० मे यादिवशी भारताला ४८ तासांत गुडघे टेकवण्यास भाग पाडायचे असा पाकिस्तानचा उद्देश्य होता.(CDS)
(हेही वाचा सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी ‘Operation Sindoor’ मागची भूमिका केली स्पष्ट, म्हणाले… )
ते पुढे म्हणाले, पाकिस्तान ४८ तास युद्ध लढू इच्छित होता. पण, त्यांनी ८ तासांत शरणागती पत्करली, असे विधान (CDS) अनिल चौहान यांनी केले. दहशतवादाला देण्यात आलेल्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवरच लक्ष्य केंद्रित केल्याचे (CDS) जनरल चौहान यांनी सांगितले. तसेच, ४८ तास भारतासोबत लढू इच्छिणाऱ्या पाकिस्तानची कारवाई अवघ्या ८ तासांत संपली, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा kaveri engine info in marathi : काय आहे कावेरी इंजिन, ज्यामुळे भारताच्या लढाऊ विमानांना मिळणार आहे अतुलनीय शक्ती? )
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवादाविरुद्ध एक नवीन रेषा आखली आहे. ते म्हणाले, युध्द हे मानवी संस्कृती इतकेच प्राचीन आहे. तसेच, कुठल्याही प्रकारच्या युध्दात दोन बाबी महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे हिंसाचार आणि त्यामागील राजकारण. आणि तिसरा घटक म्हणजे परस्पर संवाद, जो सतत होत असतो, असे (CDS) जनरल अनिल चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाकिस्तानला त्यांची चूक कळली – (CDS) जनरल चौहान
४८ तास चालेल असे पाकिस्तानला वाटलेले ऑपरेशन सुमारे ८ तासांत संपले. त्यानंतर त्यांनी(पाकिस्तान) फोन उचलत सांगितले की त्यांना(पाकिस्तान) बोलायचे आहे. (CDS) जनरल अनिल चौहान पुढे म्हणाले की, पाकिस्तानला हे कळले असेल की जर ते युद्ध लढले तर ते निश्चितच पराभूत होतील. (CDS)
Join Our WhatsApp Community