-
प्रतिनिधी
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलताना महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कोणतेही दहशतवादी कृत्य हे ‘ऍक्ट ऑफ वॉर’ (युद्धाचे कृत्य) मानले जाईल आणि त्याला त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. (Terrorism)
हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. सरकारने यापूर्वीच सिंधु जल करार निलंबित केला आणि पाकिस्तानातून आयात बंद केली आहे. (Terrorism)
(हेही वाचा – Crime News : समाजमाध्यमांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा मजकुर लिहणाऱ्या खदिजा शेखला पोलिसांकडून अटक !)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सशस्त्र दलांना कारवाईची पूर्ण मुभा दिली आहे. 26 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोवाल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सेनाप्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा दिली जाईल. (Terrorism)
पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्य सैनिक’ संबोधले, ज्यामुळे भारताचा आक्रोश वाढला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा तीव्र झाली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण अवलंबले जाईल. हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मैलाचा टप्पा मानला जात आहे. (Terrorism)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community