भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीआणि रोहिंग्या यांची केंद्र सरकारकडून धरपकड सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेश, रोहिंग्या घुसखोरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशभरात केंद्राकडून पुश-बॅक ऑपरेशन राबविण्यात येत असून यामार्फत ९०० बेकायदेशीर(Bangladeshi Infiltrators) घुसखोरांची ओळख पटविण्यात आली आहे. दरम्यान, देशात बहुतेक बांगलादेशी दिल्लीत वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.(Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा )
बेकायदेशीर घुसखोरां(Bangladeshi Infiltrators) चा एक गट कार्यरत असून त्यांच्याशी संबंधित लोक बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्यास आणि बनावट कागदपत्रे बनविण्यास, दिल्लीला नेण्यास आणि नोकऱ्या मिळवून देण्यास मदत करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी घुसखोर(Bangladeshi Infiltrators) आता अडचणीत सापडले असून दिल्लीत ९०० बेकायदेशीर घुसखोरां(Bangladeshi Infiltrators) ची ओळख पटली आहे. या सर्वांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बेकायदेशीर बांगलादेशींना हद्दपार केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्राकडून ‘ऑपरेशन पुश-बॅक’ सुरू
केंद्र सरकारने बेकायदेशीर घुसखोरांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी ‘ऑपरेशन पुश-बॅक’ सुरू केले आहे. या अंतर्गत दिल्लीत सुमारे ७०० बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरां(Bangladeshi Infiltrators) ना पकडण्यात आले आहे. या घुसखोरांना हद्दपार करण्यात आले असून सीमा सुरक्षा दला(बीएसएफ)च्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सर्वाधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखा आणि विशेष सेलच्या युनिट्स दिल्लीतील घुसखोरांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वेगाने काम करत आहेत, असे दिल्ली पोलीस गुन्हे शाखा विशेष पोलीस आयुक्कत देवेश चंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले. यंदा आतापर्यंत सुमारे ९०० बांगलादेशींची ओळख पटविण्यात आली असून ज्यांची कागदपत्रे वैध असल्याचे आढळले त्यांना सोडून देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. बेकायदेशीर आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई अंतर्गत ताब्यात घेणे, हद्दपार करणे आणि फौजदारी कारवाईचा समावेश आहे.(Bangladeshi Infiltrators)
Join Our WhatsApp Community