Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान दुर्घटने(Ahmedabad Plane Crash)नंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए)ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अहमदाबाद विमान अपघाता(Ahmedabad Plane Crash)नंतर एअर इंडियाच्या सर्व बोईंग विमानांची तपासणी केली जाणार आहे. डीजीसीएने यासंदर्भात घोषणा केली असून विमानांची सुरक्षा तपासली जाणार आहे.(Ahmedabad Plane Crash)
(हेही वाचा Israel Iran Conflict : भारतीय हवाईसेवेवर परिणाम; एअर इंडियाचे विमान अर्ध्यातूनच परतले )
दरम्यान, विमान दुर्घटने(Ahmedabad Plane Crash)नंतर एअर इंडियाच्या प्रवासी विमानांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. त्यानंतर आता डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ विमानांच्या ताफ्याची सखोल सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएकडून बोईंग विमानांची तपासणी केली जाणार असून अपघातग्रस्त बोईंग विमानातील त्रुटींचा मागोवा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
विमान अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला
गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात झाला. येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच एअर इंडियाचे विमान कोसळले. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानात एकूण २४२ प्रवाशी प्रवास करत होते. या भीषण अपघातात फक्त एकच प्रवासी वाचू शकला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विमान अपघाताचा तपास सुरू
एअर इंडियाच्या बोईंग विमानाच्या अपघाता(Ahmedabad Plane Crash)ची चौकशी सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर सापडला असून या घटनेमागील मुख्य कारणापर्यंत पोहोचणे सोपे होईल. दरम्यान, एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ विमानांच्या ताफ्याची सखोल सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. अहमदाबादमधील भीषण अपघातानंतर डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे.(Ahmedabad Plane Crash)