मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता ‘या’ मार्गे होतेय घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता 'या' मार्गे होतेय घुसखोरी

111
मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता 'या' मार्गे होतेय घुसखोरी
मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता 'या' मार्गे होतेय घुसखोरी

मुंबईत गुवाहाटी, कोलकाता येथून येणाऱ्या प्रवाशांवर एटीएस, एसआयटी तसेच मुंबई पोलिसांचा वॉच असल्याने आता घुसखोर (Bangladeshi Infiltration) कुर्ला टर्मिनसचे रेल्वे तिकिट काढून अमरावती, अकोला, भुसावळात जर्नी ब्रेक करुन पूढील प्रवास खासगी वाहनाने करीत असल्याचीही बाब पोलिस तपासात समोर आली आहे. बांगलादेशी मुलींची घुसखोरी कोलकत्याऐवजी मिझोरामकडून होत आहे. (Bangladeshi Infiltration)

हेही वाचा-Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन !

मुंबईच्या आकर्षणामुळे बहूतांश बांग्लादेशी मेघालयातील गुवाहाटी येथून थेट मुंबई गाठतात. तेथून त्यांना पुण्यासह विविध भागांमध्ये ब्युटी पार्लरचे नाव सांगून वेश्या व्यवसायात ढकलले जाते. भारत व बांग्लादेशाच्या तब्बल साडेचार हजार किलोमिटरच्या सिमेत २० टक्के भागाला कोणतेही कुंपण नाही. यामुळे एजंटांना प्रतीव्यक्ती १५ ते २० हजार रुपये देवून घुसखोरी होते. या प्रकरणाचा धागा पकडून भुसावळ पोलिसांनी पुण्यातून घुसखोर पतीपत्नीलाही अटक केली आहे. (Bangladeshi Infiltration)

हेही वाचा- Thane City Metro : ‘ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाला गती मिळणार; केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू

डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आम्ही भुसावळातील सर्व लॉजचालकांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. यामुळे शहरातील लॉजवर आलेल्या बांगलादेशी तरुणींची माहिती मिळाली. रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने पोलिस दल घुसखोरीवर नजर ठेवून आहे. (Bangladeshi Infiltration)

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागम आयोजनासाठी राज्य शासनाचे सहकार्य

ढाका किंवा अन्य शहर व गावांतून घुसखोर जाफलोंग या शहरात येतात. तेथे एजंट जंगलातून जावून बांगलादेशाची हद्द ओलांडून घुसखोरांना मेघालयमध्ये प्रवेश मिळवून देतो. दुसरा एजंट घुसखोरांना घेवून रेल्वेने मुंबईकडे निघतो. ४८ ते ५० तासांच्या या प्रवासात मध्येच मुंबई किंवा पुण्यातील एजंट घुसखोरांना रेल्वेचे तिकीट मुंबईचे असले तरी मध्येच जर्नी ब्रेक करुन अमरावती,अकोला किंवा भुसावळला उतरण्यास सांगतो. तेथे यापूर्वीच खासगी कारची व्यवस्था केलेली असते. कारमधून घुसखोर मुंबईपर्यंत पोचतात. (Bangladeshi Infiltration)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.