Sharmishtha Panoli : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)ला कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारला आहे. उच्च न्यायालयाने अंतरिम जामीनास नकार देतानाच गार्डन रिच पोलीस स्टेशनला शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)च्या अटकेची केस डायरी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.(Sharmishtha Panoli)
(हेही वाचा भारताला तिसऱ्या पक्षाची गरज नाही; सरेंडर वादात Shashi Tharoor यांचा राहुल गांधींना घरचा आहेर )
दरम्यान, सोशल मीडियावर जातीय टिप्पण्यांसह व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या इन्फ्ल्युन्सर शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)ला उच्च न्यायालयाने अखेर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २२ वर्षीय शर्मिष्ठाला कोलकाता पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुरुग्राम येथून अटक केली होती. तिथून थेट कोलकाता येथे तिला आणण्यात आले होते.
सोशल मीडियावरील डिलीट केलेल्या व्हिडिओंमधून ‘जातीय’ टिप्पण्या देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. शर्मिष्ठाच्या अटकेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधी पक्ष भाजपाने शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)च्या अटकेवरून ममता सरकारवर टीकेची झोड उठविली होती. तसेच, शर्मिष्ठाच्या अटकेसाठी कुठल्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय घिसाडघाईने कार्यवाही करण्याचा आरोपही कोलकाता पोलिसांवर केला आहे.
शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli) प्रकरण नेमकं काय?
पाकिस्तानच्या विरोधात भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईच्या यशानंतर, कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. मात्र, मुस्लिम व्यक्ती वजाहत खान याला हे आवडले नाही आणि त्याने पश्चिम बंगालमधील गार्डन रीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ममता सरकारने यावर त्वरित कारवाई करत हरियाणातील गुरुग्राममधून शर्मिष्ठा पनोलीला अटक केली.(Sharmishtha Panoli)