Operation Sindoor : आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, म्हणाले…

ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) नंतर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)नंतर 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहिणाऱ्या विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थिनीने सरकारला 'फॅसिस्ट' म्हटले होते तर काश्मीरला अधिकृत म्हणत टीका केली होती.(Operation Sindoor)

73

ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) नंतर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)नंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिणाऱ्या विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थिनीने सरकारला ‘फॅसिस्ट’ म्हटले होते तर काश्मीरला अधिकृत म्हणत टीका केली होती.(Operation Sindoor)

(हेही वाचा FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर )

दरम्यान, या प्रकरणात सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच, तिची महाविद्यालयातून हकालपट्टीदेखील रद्द केली आहे. २६ मे रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. न्यायाधीश गोडसे म्हणाले, तुम्ही एका विद्यार्थ्याचे आयुष्य उध्वस्त करत आहात. हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे? जर कोणी आपले मत व्यक्त केले तर तुम्ही त्याचे आयुष्य उध्वस्त कराल?, असे याचिकेवरील सुनावणीत म्हणाले.

न्यायमूर्तींनी विचारले, तुम्ही काय करत आहात?

विद्यार्थिनीचे वकील फरहाना शाह यांनी न्यायालयाकडून तात्काळ दिलासा मागत युक्तिवाद केला की, अटकेच्यावेळी विद्यार्थ्याच्या सेमिस्टर परीक्षा सुरू होत्या. त्यावेळी तिची हकालपट्टी अन्याय्य असून महाविद्यालयाच्या वकिलांनी पोलीस संरक्षणात परीक्षा देण्याची परवानगी द्यावी अशी सूचना केली. या सूचनेलाच पूर्णपणे फेटाळून लावत “ती गुन्हेगार नाही, असे न्यायालयाने म्हटले.

नेमकं प्रकरण काय होतं?

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर १९ वर्षीय अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी खाजिदा शेखने सोशल मीडियावर (Operation Sindoor) मोहिमेबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या. या प्रकारानंतर पोलीस यंत्रणेने तिला अटक केली होती. साजिदा शेख सध्या येरवडा तुरुंगात असून आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिची सुटका करण्यात येणार आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी, दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये २० हून अधिक हिंदू पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली होती. त्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) सुरू करून प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानमधील ०९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यावर विद्यार्थिनीने टीका केली होती.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.