Naxalist : एकट्या गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शासकीय आणि खासगी मालमत्तांचे किती नुकसान केले? जाणून घ्या आकडा

177

गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतांना नक्षलवाद्यांच्या (Naxalist) हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत ४३ वर्षांत ५१ कोटी ४६ लाख ६१ हजार रुपयांच्या शासकीय आणि खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे.

जाळपोळ करून जिवे मारण्याची भीती दाखवत आणि शस्त्रांच्या बळावर शासकीय कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न नक्षली (Naxalist) नेहमीच करतात, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. ‘जिल्ह्यात आता मूठभर नक्षली शिल्लक आहेत. लवकरच त्यांचेही उच्चाटन केले जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद्यांकडून (Naxalist) सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची सर्वांत पहिली घटना १२ जुलै १९८२ या दिवशी सिरोंचा तालुक्यातील बिर्‍हाडघाट येथे घडली. या वेळी नक्षलवाद्यांनी वनविभागाचे ८ हजार रुपये किमतीचे लाकूड कापले. यानंतर वनविभाग आणि खासगी संस्था यांचे साहित्य जाळले.

सागवानाची झाडे तोडणे, रस्त्याच्या कामावरील खासगी कंत्राटदारांचे काम बंद पाडून त्यांच्या साहित्याची जाळपोळ करणे, ग्रामपंचायतीचे साहित्य जाळणे आणि शाळांची तोडफोड करणे आदी विध्वंसक कामे नक्षलवाद्यांनी केली. या व्यतिरिक्त शासनाच्या विविध विकासकामांना विरोध करून आदिवासींना मूलभूत गरजांपासून दूर ठेवण्याचे कामही नक्षलवादी (Naxalist) सातत्याने करत आहेत.

किती गुन्हे नोंद?

वर्ष १९८० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नक्षल्यांवर (Naxalist) ५५२ खुनाचे गुन्हे, ६९९ चकमकीचे, ९७ दरोडा आणि जबरी चोरी, २० अपहरण, ५७५ जाळपोळ आणि इतर ६७५ असे एकूण २ हजार ६१८ गुन्हे नोंद आहेत.

किती नक्षली झाले ठार?

नक्षली (Naxalist) आक्रमणांत आतापर्यंत २१२ पोलीस हुतात्मा झाले आहेत, तर ५३३ सामान्य नागरिक आणि २१ विशेष पोलीस अधिकारी मिळून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५३ नागरिक घायाळ झाले आहेत. पोलीस आणि नक्षल चकमकीत ३१० नक्षली ठार झाले आहेत, तसेच ४२ घायाळ झाले. यांपैकी २४ नक्षल्यांचे मृतदेह मिळाले नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.