
नाशिक-कळवण (Nashik Accident) महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. भदाण कुटुंबियांवर काळाने घाला घातला. नाशिकमध्ये एका लग्नसमारंभानंतर हे कुटुंब परत होते. बुधवारी रात्री 10 वाजता हा कार अपघात झाला. (Nashik Accident)
नेमकं काय घडलं ?
जखमींना नाशिक येथील रुग्णालयात (Nashik Accident) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. (Nashik Accident)
हेही वाचा-देशात Corona चे सक्रिय रुग्ण ४८६६ वर ! गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू
या अपघातात चालक खालिक मेहमूद पठाण (50) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04) रा. देवळा, शैला वसंत भदाण (62) आणि त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (50) हे जागीच ठार झाले. तर उत्कर्ष मेतकर (12) रा. देवळा आणि भालचंद्र भदाण (52) हे गंभीर जखमी झाले. (Nashik Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community