मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या इंदोरच्या दाम्पत्यामधील राजा रघुवंशी याची हत्या झाली होती, तर त्याची पत्नी सोनम बेपत्ता होती. (Raja Raghuvanshi murder) या प्रकरणी आज, सोमवारी मेघालय पोलिसांनी (Meghalaya Police) मोठा खुलासा केलाय. राजाची हत्या त्याची पत्नी सोनम हिने केली असून या प्रकरणी सोनमसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनमला उत्तरप्रदेशच्या गाजीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – ७ हजार नेपाळी नागरिकांना सोडावी लागणार America; काय आहे कारण ?)
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. त्यानंतर २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही. राजा सूर्यवंशी यांच्या आईने सोनम सोबतचे त्यांचे शेवटचे बोलणे झाल्याचे सांगितले होते. त्यांनी २३ मे रोजी उपवासाचा दिवस असल्याने तिची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता, या कॉलचे रेकॉर्डिंग त्यांच्या कुटुंबाने शेअर केले आहे. ज्यात सोनमचा आवाज श्वास घेताना दमल्यासारखा ऐकू येतो. धबधबा पाहण्यासाठी जंगलात ट्रेकिंग करत असल्याचे तिने म्हटले होते.
तिने ‘नंतर फोन करते’, असे सांगितले. त्यानंतर तिचा कॉल आलाच नाही. घटनेनंतर ११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढला होता. नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी केली होती.
Within 7 days a major breakthrough has been achieved by the #meghalayapolice in the Raja murder case … 3 assailants who are from Madhya Pradesh have been arrested, female has surrendered and operation still on to catch 1 more assailant .. well done #meghalayapolice
— Conrad K Sangma (@SangmaConrad) June 9, 2025
घटनास्थळाहून राजा सूर्यवंशी यांचा मोबाईल फोन, सोन्याची चेन आणि अंगठी त्याच्या मृतदेहाजवळ सापडली नाही. फक्त त्याचे स्मार्टवॉच आढळले होते. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे झाले होते. अखेर ७ दिवसानंतर या प्रकरणाचे गूढ उकलले करण्यात पोलिसांना यश आले.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा (Conrad K Sangma) यांनी ट्विटरवर (एक्स) सांगितले की, राजा हत्याकांडात पोलिसांना ७ दिवसांत मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. महिलेने आत्मसमर्पण केले आहे. दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. या प्रकरणी माहिती देताना मेघालयाच्या पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले की, सोनम सूर्यवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, तर रात्रीच्या वेळी केलेल्या छाप्यात इतर ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी एकाला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींना एसआयटीने इंदूरमधून पकडले आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. यानंतर तिला अटक करण्यात आली. पत्नीनेच राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिली होती अशी धक्कादायक माहिती देखील पुढे आली आहे. (Raja Raghuvanshi murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community