Mumbai Crime Branch : ४८ तासांत पोलिसांनी दिला ४२ तडीपार गुन्हेगारांना दणका

गुन्हे शाखेने तडीपार गुन्हेगारांना अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

72
Mumbai Crime : मुंबईतील सुप्रसिद्ध 'पंजाबी घसीटाराम हलवाई'च्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल

तडीपार केल्यानंतर देखील हद्दीत येऊन गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मुंबई गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. मागील ४८ तासात मुंबई गुन्हे शाखेने तडीपारी नंतर देखील हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या ४२ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे. गुन्हे शाखेने तडीपार गुन्हेगारांना अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना एप्रिल २०२३ मध्ये हद्दीतून तडीपार करण्यात आले होते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Mumbai Crime Branch)

अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी इरफान शेख (२५) हा आंबेडकर नगर, चेंबूर येथून एप्रिल २०२३ मध्ये मुंबई, ठाणे नवी मुंबई हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, महिलांचा विनयभंग, शांतता भंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची टिळक नगर, विक्रोळी आणि नेहरू नगर पोलीस ठाण्यात नोंद आहे. चेंबूर येथील राहुल्या (२२) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल कातळकरवर खुनाच्या प्रयत्नाचे आरोप होते आणि तो महिला आणि इतर प्रकरणांमध्ये आरोपी होता. त्याच्यावर आरसीएफ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला ६ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि ठाणे शहरातून हद्दपार केले होते. (Mumbai Crime Branch)

(हेही वाचा – Israel Hamas War : तुमच्या प्रियजनांची आम्ही लवकरात लवकर भेट घडवून आणू; नेतन्याहू यांचे आश्वासन)

हॉर्निमन सर्कल, फोर्ट येथील वेलू नायर (३९) याचा १५ गुन्ह्यांमध्ये सहभाग होता, ज्यात दरोडा, धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, फसवणूक करणे, घुसखोरी करणे आणि इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पोलिसांनी त्याला एका वर्षासाठी हद्दपार केले होते, परंतु तो पुन्हा शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करू लागला होता. सायन-वांद्रे लिंक रोड, धारावी येथील संतोष गाजरे (३८) याच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) अन्वये सात गुन्हे आणि आयपीसी कायद्याच्या कलम ५०४, ३२४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला मार्च २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याला धारावी येथून अटक केली. (Mumbai Crime Branch)

गुन्हे शाखेच्या एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेने अलीकडेच एक कारवाई केली, ज्यांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केले होते आणि शहराची कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत करण्याची शक्यता होती अशा ४२ गुन्हेगारांना अटक केली. हे गुन्हेगार खुनाचे प्रयत्न, दरोडा, दरोडा, चोरी, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होते. पुढील तपास आणि आवश्यक कारवाईसाठी गुन्हे शाखेने सर्व गुन्हेगारांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (Mumbai Crime Branch)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.