Bengaluru Stampede: चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी फ्रँचायझीसह अनेकांविरुद्ध गुन्हा केला दाखल

184
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर, विजय साजरा करण्यासाठी बेंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. आता या प्रकरणात RCB फ्रँचायझीसह अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी RCB फ्रँचायझी, DNA एंटरटेनमेंट, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (Karnataka State Cricket Association) आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. (Bengaluru Stampede)

(हेही वाचा – Bengaluru Stampede : काँग्रेस सरकारचा असंवेदनशीलपणा पहा, पोलिसांनी सांगूनही विजयी रॅलीचे आयोजन; क्रीडा पत्रकाराने व्हिडिओत काय म्हटले?)

कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला?
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये (Cuban Park Police Station) एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनेत गुन्हेगारी निष्काळजीपणाचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कलम १०५, १२५ (१)(२), १३२, १२१/१, १९० आर/डब्ल्यू ३ (५) लावण्यात आले आहेत.
(हेही वाचा – बकरी ईदसाठी Mumbai Local मधून बकऱ्यांची अवैध वाहतूक; प्रवाशांकडून संताप व्यक्त)

आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीला बुधवारी चेंगराचेंरीचे गालबोट लागले आहे. आयपीएल २०२५ (IPL 2025) मधील पहिल्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. दरम्यान बुधवार ४ जून या दिवशी बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (Chinnaswamy Stadium Bangalore) होणाऱ्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीच्याआधी गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३४ हून अधिक जखमी झाले आहेत. बेंगळुरूचे क्रिकेटप्रेमी आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टेडियमजवळ जमले असताना ही घटना घडली. यावेळी सत्ताधारी पक्षांनी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे, तसेच या घटनेसाठी कर्नाटक सरकारला जबाबदार धरले आहे. कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) गैरव्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावाचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.