Beed हादरलं! अपघातातून बचावले पण भरधाव ट्रकने चिरडले, ६ जणांचा जागीच मृत्यू

247
Beed : राज्यासह देशभरात वाहन आपघाताच्या घटना वाढत आहेत. यामध्ये नाहक लोकांचा बळी जात आहे. दरम्यान, बीडच्या गढी परिसरात सोमवारी २६ मे रोजी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आणि गाडी अक्षकसः चक्काचूर झाली आहे. ही घटना बीड येथील गढी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली.  (Beed)

(हेही वाचा – ‘व्हिजन 2047’ मच्छिमारांसाठी दिशादर्शक ठरेल; Nitesh Rane यांनी व्यक्त केला विश्वास)

अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून, अपघातग्रस्त कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?
गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात (Accident) झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले  आहे.

(हेही वाचा – Maharashtra Rain Update: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दाणादाण! अनेक जिल्ह्यांना झोडपलं; जाणून घ्या कुठे काय घडलं ?)

अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले
पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.