उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली जिल्ह्यात भगवान श्रीरामांविषयी अशोभनीय टिप्पणी करणारा अनस पठान (Anas Pathan) याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. हा प्रकार प्रेम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. अनस पठानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भगवान श्रीरामांविषयी अपमानजनक शब्द वापरून अवध भाषेत एक पोस्ट लिहिली होती आणि ती अनेक ग्रुपमध्ये व्हायरल केली होती.
(हेही वाचा – ‘Sambhal Files’ चित्रपटासाठी काम सुरु ठेवल्यास बॉम्बने उडवू; निर्माता अमित जानींना धमकी )
पोस्ट व्हायरल होताच हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला. ही पोस्ट धार्मिक भावना भडकवणारी असल्याचे सांगत लोकांनी पोलिस आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच बरेली पोलिसांनी (Bareilly Police) तत्काळ कारवाई केली आणि 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि पोस्टसंबंधी सर्व पुरावे जप्त केले आहेत.
पोलिसांनी आरोपीचा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतो की त्याच्याकडून चूक झाली आहे आणि तो वारंवार माफी मागत आहे. अनसविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोणालाही धर्म, समाज किंवा समुदायाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. नगर क्षेत्राधिकारी प्रथम आशुतोष शिवम यांनी सांगितले की बरेली पोलिस पूर्णपणे सतर्क आहे. कोणीही सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल.
हिंदू संघटनांनी बरेली पोलिसांच्या जलद आणि निष्पक्ष कारवाईचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, हा केवळ भगवान श्रीरामांचा अपमान नव्हता, तर लाखो भक्तांच्या भावनांचा अपमान होता. या कठोर कारवाईमुळे आता कोणीही धर्म किंवा श्रद्धेशी खेळ करण्याचे धाडस करणार नाही. (Uttar Pradesh)
हेही पहा –


