बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही 28 व 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. 28 सप्टेंबर रोजी तेलंगणा राज्यात वादळाचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
त्यामुळे तेलंगणाशी संलग्न असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पुढील 6 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Depression lay centered at 0530 hrs IST of 28th September 2021 over Telangana and adjoining areas of Marathwada & Vidarbha. To weaken into a Well Marked Low Pressure Area during next 06 hours. pic.twitter.com/wK9fHxdBI9
— India Meteorological Department (@Indiametdept) September 28, 2021
गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे राज्यात 28 व 29 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
27/9, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रिवादळ काल उशिरा रात्री ओरीसा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आले.त्याची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली.त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढचे २,३ दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता.काही ठिकाणी अती वृष्टी शक्यता
– IMD pic.twitter.com/rnauojtOST— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 27, 2021
28 सप्टेंबर रोजी, या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट-
रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव.
या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली.
29 सप्टेंबर रोजी या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार.
30 सप्टेंबर रोजी मात्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर नंतर राज्याला वादळाचा कुठलाही धोका नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community