राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी साकीनाका येथील पाशवी बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थितीत केला आणि त्यासाठी २ दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी न स्वीकारता चक्क मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘महिला सुरक्षा हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याच विषयावर ४ दिवसांचे विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी, अशी सूचना केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री पत्रात?
- विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते.
- सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना मा. राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.
- उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. त्या ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय?
- उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे.
- बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला.
- उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे.
- बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते.
- उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचे एनसीआरबीचे म्हणणे आहे. पण यावर तेथे विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी तेथील भाजपने केल्याचे दिसत नाही.
- जम्मू-कश्मीरमधील कश्मिरी पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे नेहमीच शिकार व्हावे लागले. पण जम्मू-कश्मीरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी गांभीर्याने चर्चा केली.
- उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. तेथेही महिलांवरील अत्याचारांचा आलेख चढता आहे.
- देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत.
- हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत.
- म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदचे ४ दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी करावी.
(हेही वाचा : राज्यपालांनी महिला सुरक्षेसाठी लिहिलेल्या पत्राला सरकारकडून केराची टोपली?)
Join Our WhatsApp Community