-
ऋजुता लुकतुके
२० जूनला भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना हेडिंग्ले मैदानावर सुरू होईल तेव्हा आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं नवीन चक्र सुरू होईल आणि त्याचवेळी नवोदित भारतीय संघासमोरचं पहिलं मोठं आव्हान उघड होईल. हेडिंग्लेमधील कोरडं आणि थंड हवामान खरंतर भारतीय गोलंदाजांना पोषक असंच आहे. कारण, अशा टणक खेळपट्टीवर चेंडू चांगला वळतो. त्यामुळेच कुलदीपचा संघात समावेश पक्का मानला जात आहे. जडेजाच्या साथीने तो अंतिम अकरामध्ये असेल अशी शक्यता आहे. शिवाय चेंडूला मिळणारी अनियमित उसळी तेज गोलंदाजांनाही मदत करते. (India Tour of England)
हेडिंग्ले इथं भारतीय संघाची या आधीची कामगिरी कशी आहे ते पाहूया. एकूण ७ कसोटी भारतीय संघ इथं खेळला आहे. आणि एक अनिर्णित कसोटी सोडली तर कायम इथे निकाल लागला आहे. १९५२ साली भारतीय संघ इथं पहिली कसोटी खेळला होता. त्यानंतर दोन कसोटींत त्यांनी विजय मिळवला आहे. कपिल देव आणि सौरव गांगुली हे दोन भारताचे येथील विजयी कर्णधार आहेत. इथे ४ कसोटी भारताने गमावल्या आहेत. तर एक अनिर्णित राहिली आहे. २०२१ च्या शेवटच्या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला ही कसोटी एक डाव आणि ७६ धावांनी गमवावी लागली होती. (India Tour of England)
(हेही वाचा – Flight Cancellations : दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग ! कारण आलं समोर …)
हेडिग्ले (भारत वि इंग्लंड)
- कालावधी – १९५२ ते २०२५
- कसोटी – ७
- बरोबरीत – ०
- अनिर्णित – १
भारत व इंग्लंडमधील कसोटी सामने :
- पहिली कसोटी – १९५२ साली, विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लिश संघाने ७ गडी राखून हरवलं होतं.
- १९५२ नंतर भारतीय संघ या मैदानावर ७ कसोटी सामने खेळला आहे. यातील २ जिंकताना ४ सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. तर एक अनिर्णित राहिली.
- हेडिंग्ले इथं भारताने पहिली कसोटी १९८६ साली जिंकली. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडचा २७९ धावांनी पराभव केला होता.
- त्यानंतर २००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला
- उभय संघांदरम्यान इथं शेवटचा कसोटी सामना झाला तो २०२१ मध्ये. यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा १ डाव आणि ७६ धावांनी पराभव झाला होता. (India Tour of England)
(हेही वाचा – Sambhal Violence : सपा खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्यासह २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल)
भारताची हेडिंग्लेवरील कामगिरी :
- एकूण कसोटी – ७
- विजय – २, पराभव – ४
- सर्वोत्तम धावसंख्या – ८ बाद ६०२ (२००२)
- सर्वात लहान धावसंख्या – सर्वबाद ७६ (२०२१)
- सर्वाधिक वैयक्तिक धावा – दिलीप वेंगसरकर (२ कसोटींत २२८ धावा)
- सर्वात जास्त बळी – रॉजस बिन्नी (२ डावांत ७ बळी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community