Iran-Israel conflict: इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान परतले !

Iran-Israel conflict: इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान परतले !

41
Iran-Israel conflict: इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान परतले !
Iran-Israel conflict: इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान परतले !

इराण आणि इस्रायलमधील (Iran-Israel conflict) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संघर्षग्रस्त इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 17 जून रोजी 110 भारतीय विद्यार्थ्यांना उत्तरेकडील इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढून आर्मेनियाच्या सीमेवर नेण्यात आले. त्यानंतर हे ११० विद्यार्थी भारतात परतले आहेत. (Iran-Israel conflict)

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवन येथून नवी दिल्लीत पोहोचले. ‘तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. “भारतीय दूतावासाच्या मदतीने, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे”,असं या निवेदनात म्हटले आहे. (Iran-Israel conflict)

भारतीय विद्यार्थी १८ जून रोजी येरेवनच्या झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाने निघाले. १९ जून रोजी सकाळी हे विमान नवी दिल्लीत उतरले. यापूर्वी, भारताने इराणमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये याची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो.” (Iran-Israel conflict)

हेही वाचा-PM Modi Visit To Croatia : क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं ‘वेजडिन संस्कृत ग्रामर’ ; या पुस्तकाची खासियत काय ?

भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी इराण आणि आर्मेनियाने केलेल्या मदतीचे भारतीय अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये विमानतळ बंद आहेत. यानंतर, भारताने इराणला नागरिकांच्या परतीसाठी सीमेवर सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली होती. (Iran-Israel conflict)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.