
रायगड (Raigad Rain) जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी गाठली आहे. (Raigad Rain)
रायगड (Raigad Rain) जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीवर देखील झाला आहे. (Raigad Rain)
हेही वाचा- Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू
सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली खोपोली रोडवर नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील उन्हेरे फाटा येथील पुलाजवळ दोन्ही बाजूस नदीचे पाणी शिरल्याने येथील मुख्य पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेगेटींग लाऊन बंद करण्यात आली आहे. (Raigad Rain)
घटनास्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दुसरीकडे सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा येथील भेराव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवरील पुलावर देखील पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. (Raigad Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community