-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेट वे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथील भागांत समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट आता महापालिकेच्यावतीने लावली जाणार असून यासाठी दोन बोटींची खरेदी केली जाणार आहे. रिमोटद्वारे या बोटींचा वापर केला जाणार आहे. या अत्याधुनिक स्वयंचलित बोटीद्वारे समुद्रातील तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. समुद्रातील तरंगता कचरा काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीने बोटींचा वापर विविध शहरांमध्ये केला जात असतानाच मुंबई महापालिकेत याचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असल्याने प्रशासनाला उशिरा सूचलेले शहाणपण असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
गेल्या काही वर्षांमध्ये गेट वे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क परिसरात समुद्रातील कचरा प्लास्टिक, शेवाळ, आणि इतर तरंगणारा कचरा वाढत चालला आहे, ज्यामुळे परिसरातील स्वच्छता आणि समुद्री पर्यावरणावर परिणाम होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून विद्युत बोटींची खरेदी केली जाणार आहे. यासाठी सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी राम एन्व्हायरो इन्फ्रा एँड एलएलपी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. रिमोट द्वारे या बोटीतून यांत्रिक पध्दतीने समुद्रातील तरंगता कचरा काढला जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Ujjain Love Jihad Case : मुस्लिम नफीस बनला ‘कानू’, हिंदू मुलीशी केली मैत्री, अन् नंतर म्हणाला…)
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, समुद्रातील तरंगणारा कचरा गोळा करून तो हटवण्यासाठी एक कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीची गरज ओळखली आहे. गेट वे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क या भागातील वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता आणि किनाऱ्याचे सौंदर्य हे दोन्ही धोक्यात आले आहे. म्हणून गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथील समुद्रातील तरंगणारा कचरा तथा वस्तू यांचे यांत्रिक पद्धतीने साफसफाईसाठी मानवविरहित बोटींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोटींचा वापर प्रायोगिक तत्वावर या दोन्ही भागांमध्ये केला जाणार असून येत्या १५ दिवसांमध्ये प्रत्यक्षात या बोटींचा वापर केला जाणार आहे. (BMC)
कचरा संकलनासाठी मानवविरहित विद्युत बोटीसारख्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे हा तरंगत्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय करण्याचा प्रभावी आणि सक्रिय मार्ग आहे, जेणेकरून सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी समुद्री पर्यावरण सुनिश्चित करता येईल. समुद्रावरील तरंगणारा कचरा गोळा करण्याची गरज ही पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक अशा विविध कारणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क हे आपल्या शहरातील दोन महत्त्वाची ठिकाणे असून, येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागात वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता आणि किनाऱ्याचे सौंदर्य दोन्ही धोक्यात आले आहे. म्हणून या दोन्ही ठिकाणी समुद्रातील तरंगणारा कचरा/वस्तू यांचे यांत्रिक पद्धतीने साफसफाईसाठी मानवविरहित विद्युत बोटींची खरेदी केली जात आहे. या मशिनचा पुरवठा राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) मार्फत करण्यात येणार आहे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community