बुधवार, १८ जून यादिवशी मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या गाझा-पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्च्याला (Gaza-Palestine support Protest) मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही आंदोलक बेकायदा आझाद मैदानात जमले आणि त्यांनी मोर्च्याला सुरुवात करताच त्यांना आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. इथे जमण्याची अधिकृत परवानगी नसल्याच्या कारणावरून पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले. या मोर्च्याला हिंदुत्वनिष्ठांनी आधीच विरोध केला होता. या मोर्च्याला (Gaza-Palestine support Protest) परवानगी देऊ नये, यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी या मोर्च्याला परवानगी नाकारली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते मेराज हसन सिद्दीकी यांचाही समावेश होता. तसेच कॉम्रेड पी.एम. वर्तक, कॉम्रेड विवेक मॅटेरो, कॉम्रेड एस.के. रेगे, फिरोज मिठीबोरवाला, कॉम्रेड सुगंधी फ्रान्सिस, कॉम्रेड विजय दळवी, कॉम्रेड कांबळे शैलेंद्र आणि आर माय टी इराणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आदल्या दिवशी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा ३० ते ४० आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊन पुढील पावले उचलण्याचा निर्णय घेण्यासाठी सीपीआय कार्यालयात जमले. हा गट एकच बॅनर घेऊन प्रतिकात्मक मोर्चा (Gaza-Palestine support Protest) काढेल यावर सहमती झाली. हे आंदोलक बाहेर पडले. त्यांनी ‘इस्राईल मुर्दावाद, अमेरिका मुर्दावाद, आणि गाझामधील नरसंहार थांबवा, अशा घोषणा दिल्या. सुमारे दहा मिनिटे घोषणाबाजी केल्यानंतर, पोलिसांनी सुमारे ७-८ सीपीआय सदस्यांना ताब्यात घेतले आणि उर्वरित सहभागींना जबरदस्तीने पांगून परिसर सोडण्यास सांगितले.
या मोर्च्याला (Gaza-Palestine support Protest) परवानगी देऊ नये यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने आझाद मैदान पोलिसांना निवेदन दिले होते. वर्ष २०१२ मध्ये म्यानमारमध्ये (Myanmar) मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित मोर्चा दंगलीत परिवर्तित झाला होता. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस व मीडियाच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले अशा घटना घडल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा घडू शकते, अशी शक्यताही समितीने व्यक्त केली होती.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने निवेदनात म्हटले होते की, या आंदोलनामुळे मुंबईत (Mumbai) पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा (Hindus in Bangladesh) किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले यावर हे आंदोलक कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर (Gaza-Palestine support Protest) बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी समितीची ठाम मागणी होती.
Join Our WhatsApp Community