-
ऋजुता लुकतुके
अलीकडे अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातात २७० च्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दहा वर्षांतील हा सगळ्यात मोठा विमान अपघात मानला जात आहे. अपघातामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तर आहेच. शिवाय मृतांचे विम्याचे दावेही अब्जावधीवर पोहोचले आहेत. भारतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विमा दावा मानला जात आहे. एअर इंडिया कंपनीला विमा सुरक्षा पोहचवणाऱ्या जनरल इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष रामस्वामी नारायणन यांनी हा अंदाज ३९.४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असं म्हटलं आहे. (Ahmedabad Plane Crash)
फक्त विमानाला झालेलं नुकसान बघितलं, तर विमानाचा सांगाडा आणि इंजिन यांचाच विमा १२५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा आहे. तर अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांचे दावे हे ३० अब्ज रुपयांच्या घरात जातील असा त्यांचा अंदाज आहे. २०२३ साली विमान कंपन्यांकडून आलेल्या अपघात दाव्यांच्या तुलनेत या एका अपघातातील दावे हे तिपटीहून जास्त आहेत. ब्लूमबर्गने केलेल्या बातमीनुसार, विमा दाव्यांचा परिणाम अख्ख्या विमान वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. जगभरातच विमान प्रवाशांसाठी काढण्यात येणाऱ्या विम्याचे हफ्ते इथून पुढे महाग होऊ शकतील. (Ahmedabad Plane Crash)
(हेही वाचा – Iran – Israel War प्रकरणी रशियाची प्रतिक्रिया, जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले)
या अपघाताचा विचार केला तर काही नागरिक परदेशी असल्यामुळे या नागरिकांसाठी त्यांच्या देशातील विम्याचे नियम लागू होतील. त्यामुळे विमा कंपन्यांना अतिरिक्त भूदर्ड सहन करावा लागणार आहे. भारतातील विम्याचे हफ्ते मूळातच कमी असतात. पण, परदेशात नियमही कडक असल्यामुळे तिथे विमा कंपन्यांना या अपघातामुळे मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आता हफ्ते वाढतील. आणि त्याचा परिणाम भारतावरही जाणवेल असं ब्लूमबर्गच्या बातमीत म्हटलं आहे. (Ahmedabad Plane Crash)
त्याचवेळी एक दिलासा हा की, आंतरराष्ट्रीय प्रवासातील विमा महागणार असला तरी तो परिणाम देशांतर्गत प्रवासावर इतक्यात होण्याची शक्यता कमी आहे. हे हफ्ते अजूनही कमीच असतील. एअर इंडिया कंपनी आणि मृतांना द्यावी लागणारी रक्कम जमा करण्यासाठी विमा कंपन्यांनी खाजगी कंपनीची मदत घेण्याचं ठरवलं आहे. कारण, त्यांच्यासाठीही ही रक्कम जमवणं सोपं असणार नाही. (Ahmedabad Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community