Ashadhi Wari : ‘शिवसेनेचा सेवा रथ’ पंढरपूरच्या दिशेने रवाना; लाखो वारकऱ्यांना मिळणार ‘या’ मोफत सेवा

39
Ashadhi Wari : ‘शिवसेनेचा सेवा रथ’ पंढरपूरच्या दिशेने रवाना; लाखो वारकऱ्यांना मिळणार 'या' मोफत सेवा
  • प्रतिनिधी

आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर शिवसेना व धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने आयोजित ‘वारकरी सेवा रथ २०२५’ काल पंढरपूरकडे भव्य प्रस्थान ठेवण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रथाला भगवा झेंडा दाखवण्यात आला. लाखो पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असून, यंदाचे दुसरे वर्ष आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली ११२ सदस्यांची चमू सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

(हेही वाचा – India Tour of England : भारतीय संघात सरप्राईज पॅकेज? हर्षित राणाचा संघात समावेश)

मोफत सेवा सुविधांचा महापूर

वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढील सुविधा रथातून दिल्या जाणार आहेत :

  • कापडी बुटांचे वाटप – पायी चालणाऱ्यांचे पाय सुरक्षित ठेवण्यासाठी
  • औषधे, फोडावर ट्यूब्स व जखमांसाठी उपचार
  • पावसाळ्यापासून संरक्षणासाठी रेनकोट, छत्र्या
  • टाळ, ग्रंथांसाठी हँडबॅग्ज
  • शुद्ध पिण्याचे पाणी व इतर मूलभूत गरजांची पूर्तता
  • विश्रांती स्थळी पायाची मालिश देणारी सेवा
अध्यात्म, जनजागृती आणि सरकारी योजना एकत्र

या सेवा रथातून केवळ सेवा नाही तर समाजप्रबोधनही केले जाणार आहे. विविध शासकीय योजनांची माहिती, प्रबोधनात्मक कीर्तन, वासुदेव-गोंधळी यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा प्रचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विविध जनहित योजनांचा लाभ थेट वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. (Ashadhi Wari)

(हेही वाचा – Public Work Department : वारीपूर्वी महामार्ग सुरक्षित व खड्डेमुक्त करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे निर्देश)

संपूर्ण महाराष्ट्रभर ‘सेवा रथ’ चे कवरेज

हा उपक्रम केवळ पंढरपूर वारीपुरता (Ashadhi Wari) मर्यादित न राहता, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संतांची पालखी यात्रा आणि वारी मार्गांवर सक्रिय राहणार आहे. अनेक कीर्तनकार, धर्माचार्य आणि संतपरंपरेचे वंशज या उपक्रमात सहभागी होत असून, यामुळे या सेवेला अध्यात्मिक अधिष्ठान लाभणार आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यांच्या मनात शिवसेनेच्या कार्याचा ठसा उमटावा, त्यांना आधार व दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम मोठ्या श्रद्धेने आणि नियोजनाने राबवण्यात येत आहे. ‘सेवा हीच खरी वारी’ या भावनेतून शिवसेनेचा ‘वारकरी सेवा रथ’ आता वारी मार्गावर!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.