-
प्रतिनिधी
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपाने (BJP) मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये निर्णायक विजयासाठी भाजपाने पक्षप्रवेशाचा धडाका लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामार्फत महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांना गळाला लावून, नाशिकसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला मोठे भगदाड पाडण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पुढील काही महिन्यांत दर आठवड्याला छोटे-मोठे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. हे प्रवेश ‘सामान्य’ नसतील, तर महाविकास आघाडीतील बडे चेहरे आणि नाराज गटांवर थेट लक्ष केंद्रित करून भाजपा त्यांना आपल्या गोटात खेचणार आहे.
महाविकास आघाडीतील असंतोष भाजपासाठी संधी
सध्या महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद आणि नाराजीचं वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजपाने (BJP) हालचाली सुरू केल्या असून, महाविकास आघाडीतील काही नामांकित नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचेही भाजपाच्या गोटातून संकेत मिळाले आहेत. काही नेत्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष पक्षप्रवेशाची तारीखही ठरवली गेली आहे.
(हेही वाचा – Public Work Department : वारीपूर्वी महामार्ग सुरक्षित व खड्डेमुक्त करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे निर्देश)
भाजपाची ‘स्पॉट टार्गेटिंग’ रणनीती
नाशिक, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार प्रमुख विभाग भाजपाच्या (BJP) नव्या ‘स्पॉट टार्गेटिंग’ रणनीतीचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. या भागांत महाविकास आघाडीला मजबूत संघटनात्मक उपस्थिती आहे, त्यामुळेच भाजपाने तेथील नाराज गटांना आपल्याकडे खेचण्याचे धोरण आखले आहे. या भागांत भविष्यात भाजपाचे स्थानिक नेते अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘मिशन २०२५’ साठी संघटन विस्तारावर भर
भाजपाने (BJP) ‘मिशन २०२५’ अंतर्गत स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांचा समावेश हा केंद्रबिंदू ठरवला आहे. राजकीय ओळख, प्रभावक्षेत्र आणि समाजातील पकड याच्या आधारे निवड करण्यात येणार असून, पक्षप्रवेश कार्यक्रमांद्वारे एकाच वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांना सामावून घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – तीन हजार रुपयात नवीन FASTag आधारित वार्षिक पास मिळणार ; Nitin Gadkari यांची घोषणा)
राजकीय तापमान चढणार!
या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय तापमान लवकरच वाढणार हे निश्चित मानले जात आहे. एकीकडे भाजपा (BJP) आपली ताकद वाढवतोय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये गटबाजी आणि नाराजीचा फटका दिसून येऊ लागला आहे. पक्षप्रवेशांच्या माध्यमातून भाजपाने स्थानिक निवडणुकांमध्ये “खेळ पलटण्याची” तयारी सुरू केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community