Railway Police Force : दरोडे, चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाची मेल एक्सप्रेसवर करडी नजर

24
Railway Police Force : दरोडे, चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाची मेल एक्सप्रेसवर करडी नजर
  • प्रतिनिधी 

मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये नुकत्याच झालेल्या दोन दरोड्यांच्या घटनांनंतर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी(जीआरपी) मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये गस्त वाढवली आहे. तसेच, रेल्वेच्या हद्दीत चोरी होणाऱ्या मोबाईल फोन आणि इतर वस्तूचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police Force) विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील वर्षी २०२४ मध्ये जवळपास ११ हजार १४३ मोबाईल फोन चोरीला गेले होते. तर यावर्षी मागील ५ महिन्यात ३ हजार ५७६ मोबाईल फोन चोरीला गेले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. (Railway Police Force)

मुंबईतून दररोज ३१ बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या निघतात, या प्रत्येक गाड्यांमध्ये दोन रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. ते संपूर्ण ट्रेनमध्ये गस्त घालतील आणि मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत प्रवाशांचे संरक्षण करतील, यामुळे ट्रेन मध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसेल असे नवनियुक्त रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. १ जून रोजी, जयपूर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने बोरिवली ओलांडताच शस्त्रधारी दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लक्ष्य केले व ७ लाख रुपयांच्या रोख आणि मौल्यवान वस्तू असलेली ट्रॉली बॅग घेऊन पळून गेले. (Railway Police Force)

(हेही वाचा – Iran – Israel Conflict : इराण – इस्त्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; भारतावर काय परिणाम?)

त्यानंतर, ५ जून रोजी, लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड स्पेशल ट्रेन भांडुप आणि कांजूरमार्ग दरम्यान असताना एका दरोडेखोराने पनवेल येथील डॉक्टर दिपाली देशमुख यांना लक्ष्य केले. तिची पर्स हिसकावण्याच्या प्रयत्नात दरोडेखोर तिला दारापर्यंत ओढत गेला, तिचा पती तिच्या मागे लागला – नंतर त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि जोडप्याला त्याच्या मागे खाली खेचले. या घटनेमुळे दिपालीचा पती योगेश देशमुख, जो स्वतः डॉक्टर आहे, त्याना डावा हात गमवावा लागला. लोहमार्ग पोलिसांच्या (Railway Police Force) आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये चोरीचे १२,००० गुन्हे दाखल झाले, ज्यात मोबाईल फोन चोरीचे गुन्हे समाविष्ट होते. परंतु २०२४ मध्ये, केवळ रेल्वे परिसरातून ११,१४३ मोबाईल फोन चोरीला गेले. ज्यामुळे मोबाईल फोन चोरीचे मासिक सरासरी ९२८ पेक्षा जास्त झाले. या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान, ३,५७६ पेक्षा जास्त मोबाईल फोन चोरीला गेले, ज्यामुळे मासिक सरासरी ७१५ पेक्षा जास्त झाली. रेल्वेगाड्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. (Railway Police Force)

यातील सर्वात प्रमुख म्हणजे मोबाईल चोरी रोखण्यासाठी एक विशेष मोहीम. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेत एक पथक तयार करण्यात आले आहे. रेल्वेगाड्यांवरील सुरक्षा वाढविण्यात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रमुख म्हणजे मोबाईल चोरी रोखण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेल्वे पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेत एक पथक तयार करण्यात आले आहे. ही पथके तांत्रिक तपासणी करतील आणि गेल्या पाच वर्षांत त्यांच्या अधिकारक्षेत्रात चोरीला गेलेले व हरविलेले सर्व मोबाईल फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतील,” असे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी सांगितले. (Railway Police Force)

(हेही वाचा – India Tour of England : भारतीय संघाने ‘या’ खेळाडूला इंग्लंडमध्ये का ठेवून घेतलं?)

बहुतेक मोबाईल फोन चोरीच्या घटना तेव्हा घडतात जेव्हा प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना निष्काळजीपणे फोन वापरतात, असे आयुक्तांनी सांगितले. “चोर अनेकदा ट्रेनमध्ये चढण्यासाठी जमणाऱ्या मोठ्या गर्दीचा फायदा घेतात. शिवाय, बरेच लोक बोलतांना दुर्लक्ष करतात आणि दारात उभे राहून त्यांचे फोन हातात ठेवतात, ज्यामुळे चोरी करणे सोपे होते,” असे ते म्हणाले. रेल्वे परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सामानाच्या चोरीच्या घटना सर्वाधिक घडतात, त्यानंतर छेडछाडीच्या घटना घडतात, असे कलासागर म्हणाले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यांसह चार रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात आहेत, असे ते म्हणाले. (Railway Police Force)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.