-
प्रतिनिधी
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणाऱ्या राज्यातील १ हजार १०९ दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारने या अनुदानाचा खर्च गेल्या वर्षी प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या माथी मारला आहे. याआधी सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधीसाठी सामाजिक न्याय खात्याच्या निधीला हात घातला आहे. (Ashadhi Wari)
(हेही वाचा – Plane Accident : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सौदी एअर लाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला )
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर यंदा ६ जुलैच्या आषाढी एकदशीसाठी दिंडयांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. (Ashadhi Wari)
(हेही वाचा – Kali temple in Assam : आसाममध्ये काली मंदिराजवळ धर्मांधांनी फेकले गोमातेचे शिर; हिंदू संतप्त)
१ हजार १०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यास विभागाने मान्यता दिली आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी अनुदान वितरणाची कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. (Ashadhi Wari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community